|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.16° C

कमाल तापमान : 31.38° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 64 %

वायू वेग : 5.72 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.38° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.24°C - 31.24°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.71°C - 29.99°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.23°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.17°C - 30.03°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.68°C - 29.85°C

sky is clear

अजित पवार गटाकडून राज्यसभा उमेदवारांचे नाव जाहीर

अजित पवार गटाकडून राज्यसभा उमेदवारांचे नाव जाहीर– पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे उमेदवार, मुंबई, (१४ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने बुधवारी (१४ फेब्रुवारी) प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्याची घोषणा केली आहे. अजित पवार गटाने पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला असून त्यांना वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी आहे. अजित पवार गटाने उमेदवारी अर्ज...15 Feb 2024 / No Comment /

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेशमुंबई, (१३ फेब्रुवारी) – काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून ते...13 Feb 2024 / No Comment /

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा– महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, मुंबई, (१२ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी नेते काही काळ पक्षावर नाराज होते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. दरम्यान, चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही वक्तव्य आले...13 Feb 2024 / No Comment /

डोक्यावर परिणाम झालाय्, ‘गेट वेल सून’ : फडणवीस

डोक्यावर परिणाम झालाय्, ‘गेट वेल सून’ : फडणवीसमुंबई, (१० फेब्रुवारी) – उद्धव ठाकरे यांची भाषा आणि शब्दांची निवड पाहता, माझे असे ठाम मत झाले आहे की, त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपाचे कुठलेही उत्तर देणार नाही. मी, ‘गेट वेल सून’ एवढीच शुभेच्छा देईल, अशा शब्दांत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोरदार पलटवार केला. फडणवीस म्हणाले की, ज्या काही घटना घडलेल्या आहेत. या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. त्या घटना गंभीर आहेत. त्याची गंभीरता कोणीही नाकारत नाही. परंतु,...10 Feb 2024 / No Comment /

अजित पवार गटाचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

अजित पवार गटाचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखलनवी दिल्ली, (०७ फेब्रुवारी) – निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. शरद पवार गटाने कोणतीही याचिका दाखल केल्यास त्यांचीही बाजू ऐकून घ्यावी, असे अजित पवार गटाने म्हटले आहे. अजित गटाने वकील अभिकल्प प्रताप सिंग यांच्यामार्फत कॅव्हेट दाखल केले आहे. त्यांनी या कॅव्हेटमध्ये म्हटले आहे की, जर अन्य पक्षाने याचिका दाखल केली असेल तर त्यांची बाजूही ऐकून...7 Feb 2024 / No Comment /

’राष्ट्रवादी’ अजित पवार यांचीच!

’राष्ट्रवादी’ अजित पवार यांचीच!– आयोगाने अजित पवार यांच्या गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले, – निडणूक आयोगाकडून शरद पवारांना मोठा झटका!, मुंबई, (०६ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक आयोगाकडून मोठा धक्का बसला आहे. आयोगाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटालाच खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केले आहे. या सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय राखून ठेवला होता. आयोगाने आपल्या निर्णयात अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...6 Feb 2024 / No Comment /

१६ नोव्हेंबरलाच दिला राजीनामा!: भुजबळ

१६ नोव्हेंबरलाच दिला राजीनामा!: भुजबळ– मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र, अहमदनगर, (०३ फेब्रुवारी) – आपण गेल्या १६ नोव्हेंबरलाच मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देऊनच आपण सभेला गेलो. अडीच महिने शांत राहिलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की, राजीनाम्याची वाच्यता नको, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. ”मी भाषण करतो तर विरोधी पक्षनेते राजीनामा मागतात. माझ्या सरकारमधील नेते सुद्धा बोलतायत. काल एक जण बडबला की, भुजबळच्या कमरेत लात घालून त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. १७ नोव्हेंबरला ओबीसीची...3 Feb 2024 / No Comment /

विदर्भात काँग्रेससच लढवणार सर्वाधिक जागा

विदर्भात काँग्रेससच लढवणार सर्वाधिक जागा– ठाकरे, पवारांची एक दोन जागांवर होणार बोळवण, मुंबई, (०२ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीच्या या पृष्ठभूमीवर महाविकास आघाडीच्या जागवाटपासंदर्भातला फार्म्युला आता चर्चेत आला आहे. विदर्भात सर्वाधिक जागा कंग्रेस स्वतःच लढेल आणि ठाकरे, पवारांची एक दोन जागांवर बोळवण होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. पूर्व विदर्भात सहा लोकसभा मतदार संघ आहेत. यातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया आणि रामटेक या पाच मतदारसंघावर काँग्रेस निवडणूक लढण्याची शक्यता आहे. भंडारा-गोंदिया हा मतदारसंघ परंपरेने राष्ट्रवादी...2 Feb 2024 / No Comment /

जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला नेमके काय मिळाले?

जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला नेमके काय मिळाले?– राज ठाकरे यांनी उपस्थित केला सवाल, नाशिक, (०२ फेब्रुवारी) – मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळे मराठा समाजाला असा कोणता विजय मिळाला, मराठा समाजाला नेमके काय मिळाले, कशाचा विजय साजरा करण्यात आला, असे सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे उपस्थित केले. ते येथे पत्रपरिषदेत बोलत होते. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत, त्याबाबत विचारले असता, त्यांनी परखड मत मांडले. मनोज जरांगे यांची मी काही...2 Feb 2024 / No Comment /

मनी लाँड्रिंग प्रकरणात रोहित पवारांची चौकशी सुरू

मनी लाँड्रिंग प्रकरणात रोहित पवारांची चौकशी सुरूमुंबई, (०१ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आज अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. गेल्या दहा दिवसांत रोहित पवार दुसर्‍यांदा ईडीसमोर हजर झाला आहे. ३८ वर्षीय राष्ट्रवादीचे नेते कर्जन जामखेडचे आमदार आहेत. ईडीने २४ जानेवारीला त्याची शेवटची चौकशी केली होती. गुरुवारी ते दक्षिण मुंबईतील बॅलार्ड स्टेट येथील ईडी कार्यालयात पोहोचले. यावेळी...1 Feb 2024 / No Comment /

‘महाराष्ट्र शक्तिपीठ’ महामार्गाच्या कामाला गती द्या : फडणवीस

‘महाराष्ट्र शक्तिपीठ’ महामार्गाच्या कामाला गती द्या : फडणवीस– विदर्भ, मराठवाडा, कोकण, प. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांच्या विकासाला चालना, मुंबई, (३१ जानेवारी) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या द़ृष्टीने राज्यातील पवनार जि. वर्धा ते पात्रादेवी जि. सिंधुदुर्ग तसेच महाराष्ट्र-गोवा सरहद्द जोडणार्या ‘महाराष्ट्र शक्तिपीठ’ महामार्गात येणार्या जिल्ह्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी या महामार्गाच्या कामाला गती द्यावी, असा निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली...31 Jan 2024 / No Comment /

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन, मुंबई, (३० जानेवारी) – ज्येष्ठ मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटामध्ये रसिकांवर अधिराज्य गाजवले, असे मुख्यमंत्र्यांनी...30 Jan 2024 / No Comment /