Posted by वृत्तभारती
Saturday, December 18th, 2021
रामदास कदमांचा सवाल, शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर, मुंबई, १८ डिसेंबर – शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून, शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब हे निष्ठावंत कसे, असा सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आज येथे पत्रपरिषदेत केला आहे. अनिल परब यांनी मनसे आणि राकॉंच्या पदाधिकार्यांना हाताशी धरून आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला. माझ्या मुलाला तिकीट मिळू नये म्हणून अनिल परब यांनी खूप प्रयत्न केले. राकॉंचे संजय कदम...
18 Dec 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, October 31st, 2021
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन, चिखली अर्बनच्या उपक्रमांचे कौतुक, चिखली, ३१ ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर धोरणांमुळे भारताची मान जगात उंचावली असून, भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. आपल्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून रोजगार वाढविणार्या योजना वाढविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. चिखली अर्बन बँकेचे उत्कृष्ट काम सुरू असून, लोकांना रोजगार देण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. त्या माध्यमातून चिखली अर्बन बँक विधायक कार्य करीत आहे, असे प्रतिपादन...
31 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, October 23rd, 2021
१९ व्या मजल्यावरून पडून एकाचा मत्यू, मुंबई, २२ ऑक्टोबर – मुंबईतील लालबाग परिसरात वन अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीला आज शुक्रवारी भीषण आग लागली. आगीतून जीव वाचवण्यासाठी बाल्कनीला लटकलेल्या सुरक्षारक्षकाचा खाली पडून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही तासांतच आग नियंत्रणात आणली. या इमारतीच्या १९ व्या मजल्यावर दुपारी बाराच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग हळूहळू वाढत २५ व्या मजल्यापर्यंत पसरली. यावेळी इमारतीत काही रहिवासी होते. आग लागल्यानंतर १९...
23 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, October 4th, 2021
अमली पदार्थ सेवन प्रकरण, मुंबई, ४ ऑक्टोबर – अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य तिघांना किल्ला न्यायालयाने गुरुवारपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने आर्यन खानबरोबरच मुनमून व अरबाज या दोघांनादेखील गुरुवारपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. अतिरिक्त महाधिवक्ता अनिलसिंह यांनी एनसीबीची बाजू मांडली. आर्यनच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक छायाचित्र...
4 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, October 3rd, 2021
तिघांसह कोठडीत रवानगी, एनसीबीची कारवाई, क्रूझवरील रेव्ह पार्टीत होती धनिकबाळे, मुंबई, ३ ऑक्टोबर – मुंबईतील अमलीपदार्थांची प्रकरणे काही कमी होण्याचे नाव घेत नाही. मादकपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात् एनसीबीने शनिवारी रात्री उशिरा एका क्रूझवर सुरू असलेल्या रेेव्ह पार्टीवर छापा मारून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर १० तास झालेल्या चौकशीनंतर आर्यनसह तीन जणांना अटक करण्यात आली. उर्वरित तीन जणही सध्या एनसीबीच्या ताब्यात आहेत. दरम्यान, रविवारीही सुरू राहणार्या...
3 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, September 9th, 2021
जावेद अख्तर यांच्या विरोधातील याचिका फेटाळली, मुंबई, ९ सप्टेंबर – बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत विरोधात सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून कंगनाला कोणताही दिलासा मिळालेला नाही. कंगनाने जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे कंगनाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. गीतकार जावेज अख्तर यांनी कंगना विरोधात उच्च न्यायालयामध्ये मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने दाखल केली होती....
9 Sep 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, September 2nd, 2021
‘बिग बॉस’ विजेत्याची अकाली एक्झिट, मुंबई, २ सप्टेंबर – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या ४० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. अतिशय धक्कादायक एक्झिट घेतलेल्या सिद्धार्थच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने काही औषधे घेतली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी मुंबईतील कुपर रुग्णालयात नेले असता मृत घोषित करण्यात आले. झोपेतच हृदय विकाराच्या...
2 Sep 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, August 3rd, 2021
अदानी समूहाचा फलकही तोडला, मुंबई, २ ऑगस्ट – अदानी एअरपोर्टच्या फलकाला विरोध करीत शिवसैनिकांनी आज सोमवारी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर तोडफोड केली. या विमानतळाचे संचालन आता अदानी समूहाच्या हाती असून, शिवसैनिकांनी अदानी एअरपोर्ट हा फलक तोडला. या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, असे नाव देण्यात आले आहे. मात्र, आता येथे अदानी एअरपोर्ट असा फलक लावण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे....
3 Aug 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, July 20th, 2021
लोकल सेवा विस्कळीत, विक्रोळीत रस्त्यांना नदीचे स्वरूप, मुंबई, १९ जुलै – राज्याच्या राजधानीला रविवारी पावसाचा जबरदस्त तडाखा बसल्यानंतर आज सोमवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने पुन्हा झोडपून काढले. उल्हासनगर येथे ४०० मि.मी. इतका पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याने मुंबईत पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उपनगरे आणि अन्य ठिकाणी अतिमध्यम ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचवेळी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य मार्गावर...
20 Jul 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, July 18th, 2021
अनेक घरांवर भिंती व दरडी कोसळल्या, सर्वत्र हाहाकार, चेंबूर, विक्रोळी, भांडुपमध्ये पाऊस ठरला काळ, मुंबई, १८ जुलै – मुंबई आणि आसपासच्या परिसरात शनिवारी रात्रभर मुसळधार पावसाने थैमान घातले. चेंबूर, विक्रोळी आणि भांडुपमध्ये पावसामुळे दरड पडल्याने घरे कोसळली. यात २९ जणांचा मृत्यू झाला. चेंबूरमध्ये २१ जणांचा, विक्रोळीत झोपडपट्टीवर दरड कोसळून सात जणांचा आणि भांडुपमध्ये भिंत कोसळून १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. चेंबूरमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही...
18 Jul 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, July 18th, 2021
वाहतुकीची प्रचंड कोंडी, नागरिकांची त्रेधातिरपीट, मुंबई, १८ जुलै – शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा मुंबईला जबरदस्त तडाखा बसला असून, अवघे महानगर जलमय झाले आहे. शहरातील मुख्य तसेच अन्य लहानसहान रस्ते पाण्याखाली गेले असून, अनेक भागात वाहतुकीची कोंडी झाली आहे. भायखळा, सायन, अंधेरी भागात पाणीच पाणी झाले आहे. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे सकाळी कामाला निघालेल्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत. मुंबईत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहरातील मुख्य...
18 Jul 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, July 17th, 2021
मुंबई, १७ जुलै – विदेशातून भारतात आलिशान गाड्यांची तस्करी करणार्या टोळीचा पहिल्यांदाच पर्दाफाश करण्यात आला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात प्रतिबंधक अमलीपदार्थ वा मानवी तस्करी अनेकदा उघडकीस आली आहे, पण मागील पाच वर्षांत विदेशातून तब्बल २० आलिशान गाड्यांची भारतात तस्करी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजकारणातील लोकांशी असलेले संबंध वापरून आरोपी अशा गाड्यांची भारतात...
17 Jul 2021 / No Comment /