|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.28° C

कमाल तापमान : 31.09° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.86 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.09° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.38°C - 32.99°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

28.33°C - 29.84°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.92°C - 30°C

light rain
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.9°C - 29.76°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.35°C - 29.36°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.68°C - 30.04°C

sky is clear

कॉंग्रेसचा झाला संसदीय मुखभंग!

कॉंग्रेसचा झाला संसदीय मुखभंग!•चौफेर : अमर पुराणिक• जर कॉंग्रेस आपल्या अडमुठ्‌या भूमिकेवर अडून राहणार असेल तर मग भाजपाला इतर विरोधी पक्षांना कॉंग्रेसपासून वेगळे पाडावे लागेल किंवा मग  संसद चालवल्याशिवाय शासन चालवण्याचा उपाय शोधावा लागेल. कॉंग्रेसला आपले उरले सुरले अस्तित्व शिल्लक राखायचे असेल तर अवसानघातकी राजकारण सोडणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर मग कॉंग्रेसचा अंत जवळ आला आहे असे म्हणावे लागेल. पण स्वत:च्या अंताबरोबरच कॉंग्रेस देशाचे फार मोठे नुकसान करत आहे, त्याला...23 Aug 2015 / No Comment /

कॉंग्रेसला ना संसदीय मुल्यांची चिंता, ना राष्ट्रहिताची!

कॉंग्रेसला ना संसदीय मुल्यांची चिंता, ना राष्ट्रहिताची!•चौफेर : अमर पुराणिक• सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेचा तार्किक विरोध करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे पण या अधिकाराच्या आडून अतार्किक विरोध करत संसद ठप्प करण्याचा, गोंधळ घालण्याचा अधिकार कॉंग्रेसला कोणी दिला? कॉंग्रेसची ही नीती म्हणजे नकारात्मक राजकारणाची हद्द झाली आहे. कॉंग्रेसला जशी लोकशाही मुल्यांची पर्वा नाही तशीच राष्ट्रहिताचीही पर्वा नाही. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस संसदेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचे दुस्साहस करत आहे ते देशाचा विकासरथ रोखण्यासाठीच. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली...16 Aug 2015 / No Comment /

याकूबच्या फाशीचा सेक्यूलर कांगावा!

याकूबच्या फाशीचा सेक्यूलर कांगावा!•चौफेर : अमर पुराणिक• मुंबई बॉम्बस्फोट मालिकेची क्रुरता आणि भयानकता अजूनही देशवासीय विसरलेले नाहीत. अशा हल्ल्यातल्या आरोपीला फाशी दिल्यानंतर त्याबद्दल उर बडवून घेणार्‍यांनी आपल्या राष्ट्रनिष्ठेचा पुर्नविचार करावा. अन्यथा हे राष्ट्र रसातळाला जायला वेळ लागणार नाही. १९९३ मध्ये मुंबईत १३ बॉम्बस्फोटांची मालिका घडवणार्‍या याकूब मेमनला फाशी देण्यात आल्यानंतर देशवासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भारतीय न्यायव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा अभिमान निर्माण झाला असताना काही सेक्यूलरांनी मात्र याकूबच्या फाशीबाबत देशातील वातावरण कलूषित करण्याचा प्रयत्न...9 Aug 2015 / No Comment /

कॉंग्रेसला शेतकर्‍यांची नव्हे तर सत्तासुंदरीची चिंता!

कॉंग्रेसला शेतकर्‍यांची नव्हे तर सत्तासुंदरीची चिंता!•चौफेर : अमर पुराणिक• र्कॉग्रेसने ६० वर्षे सत्ता उपभोगूनही देशाचे हित, महाराष्ट्राचे हित, शेतकर्‍यांची भरभराट का साधली नाही? कॉंग्रेसला इतकी वर्षे सत्ता उपभोगूनही जनतेचे, शेतकर्‍यांचे भले का करता आले नाही? भाजपा-सेनेच्या सरकारकडून मात्र केवळ ९ महिन्यात विकास होणे कॉंग्रेसला अपेक्षित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतोय त्याचे कारण काय? याचा विचार कॉंग्रेसच्या नेत्यांनीच करावा. इतक्या प्रदिर्घ सत्ताकाळात शेतकर्‍यांच्या सामान्य गरजाही कॉंग्रेस पुर्ण करु शकलेली नाही त्यामुळे आज शेतकर्‍यांसमोर आत्महत्येशिवाय...26 Jul 2015 / No Comment /

भारत-मध्य अशिया संबंधाचा नवा अध्याय!

भारत-मध्य अशिया संबंधाचा नवा अध्याय!•चौफेर : अमर पुराणिक• मध्य अशियावर चीनचे प्रेम हे उगीच नाही. मध्य अशियाई देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. खनिज संपदेने भरलेले उज्बेकिस्तान, कझाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान हे देश जगातील सर्वात मोठे तेल आणि नैसर्गिक गॅस मिळणारे देश आहेत. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी भारत-मध्य अशियाच्या या नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे. नरेंद्र मोदी यांची ही परराष्ट्र नीती देशाला आर्थिक, सांस्कृतिक आणि सामरिक बाबतीत नव्या क्षितीजावर घेऊन जाईल. बदलत्या जागतिक परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी...19 Jul 2015 / No Comment /

‘डिजिटल इंडिया’: मोदी सरकारचं क्रांतिकारी पाऊल!

‘डिजिटल इंडिया’: मोदी सरकारचं क्रांतिकारी पाऊल!•चौफेर : अमर पुराणिक• डिजिटल इंडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक उत्पादनात भारताला स्वयंपुर्ण बनेल. तंत्रज्ञान विकसनाच्या क्षेत्रातही भारत नव्या कक्षा पार करु शकेल. यामुळे नागरिकांना वेगवान ई-सुविधा उपलब्ध होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशात डिजिटल इंडियाची सुरुवात करुन मोठे क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. पण ही योजना वेळेत पुर्ण करणे आणि कार्यान्वित करणे हे मोठे आव्हान मोदी सरकारला पेलावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. आता...12 Jul 2015 / No Comment /

बिहारच्या जनतेची सत्वपरिक्षा

बिहारच्या जनतेची सत्वपरिक्षा•चौफेर : अमर पुराणिक• बिहारमध्ये केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नीतिश कुमारांचे जनता परिवाराजवळ जाणे, कॉंग्रेस, कम्युनिस्टाशी युती करण्याचा प्रयत्न करणे हे त्यांच्या राजनैतिक उद्देशाला अनुकुल नाही. सकारात्मक राजकारणाची ही लक्षणं नाहीत आणि नकारात्मक राजकारण आता चालण्याची शक्यता कमीच आहे. भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकावी लागणार आहे. भाजपाला बिहारच्या जनतेला अश्‍वस्त करावे लागणार आहे. एकंदर ही निवडणूक म्हणजे बिहारच्या जनतेची खरी सत्वपरिक्षा ठरणार आहे. बिहार विधानसभा निवडणूका जवळ येत...5 Jul 2015 / No Comment /

भारताच्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ!

भारताच्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ!•चौफेर : अमर पुराणिक• आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान योगदिनामुळे उंचावली आहे यात दूमत नाही. भारताचा हरवलेला सन्मान योगदिनामुळे पुन्हा मिळाल्याची भावना देशवासियांमध्ये निर्माण झाली आहे. भविष्यात याचा भारताच्या विकासासाठी मोठा लाभ मिळणार आहे. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला मात्र आंतरराष्ट्रीय योगदिनात राजकीय तमाशा दिसतोय. योगदिनाबाबत काँग्रेस नेते वाट्टेल तसे स्वैर आरोप करत सुटले आहेत. भारताला मिळालेल्या वैश्‍विक सन्मानाचा काँग्रेसला पोटशूळ उठला आहे हेच यातून ध्वनीत होते. विश्व-गुरु भारताने...28 Jun 2015 / No Comment /

शत्रूराष्ट्राची तरफदारी करणारी कॉंग्रेस!

शत्रूराष्ट्राची तरफदारी करणारी कॉंग्रेस!•चौफेर : अमर पुराणिक• आपले दुर्दैव हे आहे की आपल्याच देशातील विरोधी पक्षाला आणि काही तथाकथित विद्वानांना म्यानमारमधील सेनेची कारवाई अयोग्य वाटली. पाकिस्तानसारख्या शत्रुदेशाबद्दल नक्राश्रू वाहणार्‍या कॉंग्रेसची लायकी आणि त्यांचा खरा चेहरा देशवासियांनी पुन्हा पाहिला आहे. माध्यमं आणि कॉंग्रेस म्यानमारमधील सेनेच्या कारवाईच यश झाकोळण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. ललीत मोदीच्या प्रकरणावरुन सुषमा स्वराज यांच्या राजिनाम्याचा घोषा लावला आहे. दम नसलेली खोटी प्रकरण काढण्यापेक्षा भारतात अनेक समस्या आहेत त्याचा पाठपुरावा कॉंग्रेसने...21 Jun 2015 / No Comment /

पाण्याचे आंतरराष्ट्रीय राजकारण!

पाण्याचे आंतरराष्ट्रीय राजकारण!•चौफेर : अमर पुराणिक• सिंधु, ब्रह्मपुत्रा, तीस्ता आणि गंगा नदीच्या पाण्याच्या वाटणीवरुन चीन, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशाबरोबर तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. चीन आणि नेपाळच्या तूलनेत भारत खालचा देश आहे पण बांगलादेशाच्या बाबतीत भारत वरचा देश आहे. त्यामुळे पाण्यासाठी भारताला चीन, नेपाळकडे पहावे लागते तर बांगलादेशाला भारताकडे पहावे लागते. सर्वत्र समप्रमाणात पाणी उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा हा असमतोल टाळणे आवश्यक आहे. जसं सीमेवरुन आंतरराष्ट्रीय राजकारण चालतं तसंच किंबहूना त्याहून जास्त पाण्यावरुन...14 Jun 2015 / No Comment /

राहुल गांधी यांचं अपरिपक्व राजकारण!

राहुल गांधी यांचं अपरिपक्व राजकारण!•चौफेर : अमर पुराणिक• कॉंग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या कोल्हेकुईचं खरं कारण हे आहे की, कॉंग्रेसला जे जमलं नाही ते पंतप्रधान नरेंद्र मोदी दणक्यात करुन दाखवत आहेत. त्यांच्या प्रत्येक परदेश दौर्‍यात सार्‍या जगाच लक्ष भारताकडे केंद्रित झालं आहे, ही खरी कॉंग्रेसची पोटदूखी आहे. मोदी यांनी या परदेश दौर्‍यात किती मोठ यश मिळवलं हे महत्त्वाच आहे, पण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची कॉंग्रेसची इच्छा नाही. जवळ-जवळ ६ महिन्यांनंतर राहुल गांधी आपला मतदार संघ...7 Jun 2015 / No Comment /

नव्या भारताच्या पायाभरणीचं वर्ष!

नव्या भारताच्या पायाभरणीचं वर्ष!•चौफेर : अमर पुराणिक• या वर्षभरात मोदी सरकारने कोणत्याही नुकसानी शिवाय आपली राजकीय कारकीर्द उंचावली आहे. या वर्षातील पायाभरणीचा फायदा येत्या ४ वर्षात मिळणार आहे. कोणत्याही भंपक घोषणा न करता सरकारने वास्तववादी भूमिका घेत या वर्षभरात आजपर्यंत झालेली नुकसान भरपाई थांबवत, देशाची मजबूत पायाभरणी करण्याकडे लक्ष केंद्रीत केलेले दिसते. याचा फायदा देशवासियांना येत्या काळात मिळेल यात शंका नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रालोआ सरकारला आता एक वर्ष पुर्ण होत...24 May 2015 / No Comment /