किमान तापमान : 29° C
कमाल तापमान : 31.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 1.71 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.99° C
26.59°C - 31.99°C
scattered clouds26.36°C - 29.62°C
sky is clear26.21°C - 28.95°C
scattered clouds25.5°C - 28.56°C
sky is clear25.47°C - 29.11°C
sky is clear25.63°C - 28.83°C
scattered clouds=संवेदनशीलतेने काम करण्याचे अधिकार्यांना आवाहन=
यवतमाळ, [३ मार्च] – ‘मोठी धरणे ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून तातडीचा उपाय म्हणून जलयुक्त शिवार कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. विभागातील ६४ हजार विहिरींपैकी ३१ हजार विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विहिरींची कामे तातडीने पूर्ण करावी. या विहिरींना विद्युत विभागाने त्वरित वीज जोडण्या द्याव्यात. त्यामुळे शेतकर्यांना शाश्वत शेती करता येईल. जोपर्यंत आपण शेतकर्यांना सिंचनाची हमी देणार नाही, शेतात ओलावा निर्माण करणार नाही, तोपर्यंत मूळ प्रश्नाकडे दुर्लक्षच होईल. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर सिंचन हाच ठोस उपाय आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित विभागीय आढावा बैठकीत केले.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सभागृहात शेतकरी आत्महत्या व त्या अनुषंगाने सिंचन, कृषी, पतपुरवठा, अपूर्ण सिंचन प्रकल्प, सिंचन विहिरी याबाबत चर्चासत्राचे आयोजन मंगळवार, ३ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
‘जोपर्यंत आपण शेतकर्यांना सिंचनाची हमी देणार नाही, शेतात ओलावा निर्माण करणार नाही, तोपर्यंत मूळ प्रश्नाकडे दुर्लक्षच होईल. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाणीसाठे तयार करा, जेणेकरून शाश्वत शेती निर्माण होईल. विहिरींची कामे कालमर्यादेत पूर्ण करा. मोठी धरणे ही निरंतर प्रक्रिया आहे. छोटे बंधारे व विहिरी चांगले पर्याय ठरू शकतात,’ असे चर्चासत्रातील मते जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले.
मध्यप्रदेश सरकारने पाच वर्षांत तीन लाख विहिरी निर्माण केल्या. परिणामी त्यांचा कृषी विकास दर २४ टक्क्यांपर्यंत पोहोचला. त्यामुळे प्रत्येकाने जीव ओतून काम करण्याची गरज आहे. प्रत्येकात संवेदना निर्माण झाली पाहिजे. आपल्या भागातील शेतकरी आत्महत्या करतो ही आपल्यासाठी अशोभनीय बाब आहे, अशी भावना निर्माण झाली पाहिजे. लोकप्रतिनिधींनीदेखील सहभाग दाखविणे आवश्यक आहे. एकप्रकारे आव्हान म्हणून हे काम आपण हाती घेतले पाहिजे. निधीची कमतरता भासणार नाही आणि सर्वेक्षण वस्तूनिष्ठ होणे आवश्यक आहे म्हणजे वस्तुस्थिती समोर येईल आणि त्याप्रमाणे त्यावर उपाययोजना करता येईल, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.