Posted by वृत्तभारती
Sunday, March 17th, 2024
– मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका, मुंबई, (१७ मार्च) – आपल्या पंतप्रधानांनी एकही दिवस सुटी घेतलेली नाही. देशासाठी वाहून घेत अविरत काम करणार्या व्यक्तीला बदनाम करण्याशिवाय, विदेशात फिरायला जाण्यार्यांना दुसरे कामच काय? अशा शब्दांत खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वोत्कृष्ट नेता आहे. जगाच्या क्रमवारीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी...
17 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, March 16th, 2024
– महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे पूर्ण वेळापत्रक!, नवी दिल्ली, (१६ मार्च) – केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी ५ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये मतदान होईल. या जागांसाठीची अधिसूचना २० मार्च रोजी जारी होईल. नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक २७ मार्च रोजी असून, अर्जांची छाननी २८...
16 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, March 14th, 2024
– चंद्रशेखर बावनकुळेंचे मनसे संबंधित प्रतिपादन, मुंबई, (१४ मार्च) – उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक ४८ लोकसभेच्या जागा आहेत. महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना मनसेला १ ते २ जागा देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. याबाबत महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप आणि राज ठाकरे यांच्या पक्षाबाबत पक्षाचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. या विषयावर नक्कीच चांगला निर्णय होईल, असे ते म्हणाले. केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल ते...
14 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 13th, 2024
– मंत्रिमंडळात अनेक मोठे निर्णय, अहिल्या नगर (अहमदनगर), (१३ मार्च) – आचारसंहितेपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला महाराष्ट्र मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून आता अहिल्या नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी औरंगाबादचे नाव संभाजी नगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव होते. आशा वर्करला मोठी भेट, पगारात वाढ याशिवाय ब्रिटीश काळात नाव देण्यात...
13 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 13th, 2024
– उद्योग, प्रदूषित पाण्यामुळे नद्या बाधित, – पाण्यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज, – नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन, नागपूर, (१३ मार्च) – भारतीय संस्कृतीत गंगा, गोदावरी, नर्मदा, कावेरी, कृष्णा, ब्रह्मपुत्र आणि यमुना या सप्त नद्यांचे महत्त्व पूर्वीपासूनच आहे. भारतीय जनमानस पूर्वीपासूनच नद्यांशी जोडला गेला आहे आणि त्यामुळेच त्याने आपल्या जीवनात नद्यांना माता म्हणून स्थान दिले आहे. पूर्वी या नद्या निर्मळ, प्रवाही आणि पवित्र होत्या. कारण, त्यावेळी औद्योगिक क्रांती, प्रदूषण फार नव्हते. कालांतराने...
13 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
– मुंबई कोस्टल रोडचे उद्घाटन, मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मुंबई कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. पहिल्या टप्प्यात कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते दक्षिण मुंबईतील वरळीला जोडणार आहे. साडे दहा किलोमीटर लांबीचा हा मार्ग आज सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याचे कौतुक करत हा अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे म्हटले. अधिकार्यांनी सांगितले की, कार चालक वरळी सीफेस आणि हाजी अली इंटरचेंज, आमर्सन इंटरचेंज येथून...
11 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
मुंबई, (११ मार्च) – महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर एनडीएच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. यापूर्वी ही बैठक रात्री उशिरा झाल्याचे सांगण्यात येत होते. महाराष्ट्रातील महायुतीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी अद्याप त्याची घोषणा झालेली नाही, असे महायुती आघाडीकडून बोलले जात आहे....
11 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
– पाच ते सहा जागांसाठी पवार, ठाकरे आग्रही, मुंबई, (९ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून, वंचितला किती जागा द्यायच्या, यावरून आघाडीत मतभेद उफाळून आले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितला किमान पाच ते सहा जागा मिळाव्या, असे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे मत आहेत, तर नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांची वंचितला फक्त तीन जागा देण्याची भूमिका आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली....
11 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
– लोकसभेचे ३ उमेदवार केले जाहीर, अकोला, (०३ मार्च) – महाविकास आघाडीच्या पुढच्या बैठकीचे मला निमंत्रण नाही आहे. ६ मार्चला शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण. पुण्यात मोदीबागेत नेहमी जात असतो. माझ्या दोन मेव्हण्या सुद्धा तिथे राहतात, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये महाविकास आघाडी व वंचित बहुजन आघाडीची युती होणार आहे की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरु असल्याच्या...
3 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
मुंबई, (०२ मार्च) – महाराष्ट्रात गेल्या चार दशकांपासून पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत यावेळी कौटुंबिक लढत होणार आहे. बारामती येथे आयोजित नमो रोजगार मेळाव्यात याची पुष्टी झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मंचावर बसल्या. या मेळाव्यात शरद पवार यांच्यासोबत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेही व्यासपीठावर उपस्थित असल्या तरी कार्यक्रमात चर्चेचे आणि आकर्षणाचे केंद्र सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती. अजित पवार यांनी सुनेत्रा...
3 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
मुंबई, (०२ मार्च) – हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. हिंसक वक्तच्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही. ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, तो कधीही असा मार्ग अवलंबणार नसल्याचा विश्वास व्यक्त करीत, विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी असून, त्यासाठी उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यात किंवा देशात चुकीचा संदेश जाणे, अत्यंत घातक आहे. त्यामुळे शासनाने या...
3 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, February 25th, 2024
मुंबई, (२५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने एका पत्राद्वारे केली आहे. याबाबत वंचितने शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी, म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. ही अंतिम मुदत...
25 Feb 2024 / No Comment /