Posted by वृत्तभारती
Friday, May 12th, 2023
– भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंनी पाठविले पत्र, नवी दिल्ली, (१२ मे) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानाच्या नूतनीकरणावर ४५ कोटी रुपये खर्च केल्याने त्यांच्यावर चुहुबाजूने टीकेची झोड उठत आहे. भाजपच्या आरोपानुसार केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी कोट्यवधींचे कार्पेट्स, पडदे, मार्बल लावले आहेत. या मुद्दावरून महाराष्ट्रातील भाजपचे नेते खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आक्रमक होत केजरीवालांना थेट आव्हान दिले आहे. अण्णा हजारेंना प्रतिज्ञापत्र देऊन आयुष्यभर मंदिरात राहण्याचे वचन...
12 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 12th, 2023
-बॉबस्फोटाच्या ठिकाणाहून पोलिसांना सापडले पत्र, चंदिगढ, (१२ मे) – पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ गुरुवारी स्फोट झाला. पाच दिवसांत स्फोटाची ही तिसरी घटना आहे. या स्फोटांमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, आता स्फोटाच्या ठिकाणी एक पत्र सापडले आहे.यामध्ये खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांना सोडण्याचे सांगण्यात आले आहे. पत्र मिळाल्यानंतर पोलीस अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. बॉम्बस्फोट प्रकरणात पंजाब पोलिसांनी नवीन स्थानिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित ५ जणांना...
12 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 12th, 2023
नवी दिल्ली, (१२ मे) – रशियाने युक्रेनवर हल्ला केला तेव्हा हे युद्ध फार काळ चालणार नाही आणि लवकरच युक्रेन गुडघे टेकेल असे सार्या जगाला वाटले होते. पण युक्रेनने सर्व अंदाज झुगारून लावत गुडघे टेकण्यास नकार दिला. एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे, परंतु हे युद्ध अजूनही सुरूच आहे. अशा स्थितीत हे युद्ध आता रशियासाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे, ज्यासाठी ते कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे. कीव मधील एनजीओने दावा केला...
12 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 12th, 2023
नवी दिल्ली, (१२ मे) – ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या विरोधात निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल, तामिळनाडू सरकारकडे उत्तर मागितले.सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही राज्य सरकारांना फटकारले आणि ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट देशभरात दाखवला जात असताना त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचे कारण काय, अशी विचारणा केली. सुप्रीम कोर्टाने तामिळनाडू सरकारला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दाखवणार्या चित्रपटगृहांना सुरक्षा पुरवण्यासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती देण्यास सांगितले. उगख...
12 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 12th, 2023
-१४ मे रोजी जम्मू-काश्मीरातील वातावरण चिघळवण्याचा कट, -भारतीय गुप्तचर यंत्रणा अलर्टवर, नवी दिल्ली, (१२ मे) – जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा काश्मिरी दहशतवादी यासिन मलिक याची पत्नी मुशाल हिने १४ मे रोजी भारताविरोधात वातावरण चिघळवण्याचा मोठा कट रचला आहे. पीओकेमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांपासून मुशाल हुसैन मलिक आणि इतर अनेक दहशतवादी संघटनांपर्यंत भारतीय गुप्तचर यंत्रणांना दहशतवादी कटाची गुप्त माहिती मिळाली आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये रचलेल्या या कटात पाकव्याप्त काश्मीरमधील काही दहशतवादी आणि त्यांच्या संघटनांनी...
12 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 12th, 2023
गंगटोक, (१२ मे) – ज्या सरकारी कर्मचार्यांना दोन-तीन मुले आहेत त्यांना आता आगाऊ पगार मिळणार सोबतच या कर्मचार्यांच्या पगारातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिक्कीम सरकारने हा निर्णय राज्याची स्थानिक लोकसंख्या वाढवण्यासाठी घेतला आहे. यावर्षी १ जानेवारीपासून पगार वाढवून अॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. १० मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत कार्मिक विभागाचे सचिव रिंजिंग चेवांग भुतिया यांनी सांगितले की, सिक्कीम प्रमाणपत्र किंवा ओळख प्रमाणपत्र धारण करणार्या सरकारी...
12 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 12th, 2023
मुंबई, (१२ मे) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भविष्यात पंतप्रधान होऊ शकतात, असा दावा राज्याचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केला आहे. शरद पवारांसारखा माणूस होणे नाही. हा शेवटचा माणूस आहे, असे गौरवोद्गार काढत त्यांनी परिस्थिती बदलली तर शरद पवार पंतप्रधानही होऊ शकतील, असा दावा केला आहे. यशवंतराव गडाख म्हणाले, ईडीच्या भीतीने लोक आज सोडून चालले आहेत. पण त्यांनी ठामपणे सांगितलं आहे की तुम्ही कुठेही जा, मी माझा पक्ष वाढवणार....
12 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 12th, 2023
– देशात २,२१० नव्या विमानांची गरज भासणार, नवी दिल्ली, (१२ मे) – भारतात विमान विक्री आणि सेवाक्षेत्रांमध्ये वेगाने मोठी वाढ होत आहे. आपली कंपनी सुद्धा सर्व क्षमता जोपासत भागीदारांसोबत काम करेल, असे मत बोईंग कमर्शियल एअरप्लेनचे उपाध्यक्ष रेयान विअर यांनी व्यक्त केले. त्यांनी यावेळी गो-फर्स्ट कंपनीसमोर उभ्या ठाकलेल्या इंजीनसंबंधी अडचणींवरील उपाययोजनांचाही ऊहापोह केला. चालू वर्षाच्या सुरुवातीला बोईंगने भारताला पुढील २० वर्षांच्या कालावधीत सुमारे २ हजार २१० नव्या विमानांची गरज भासेल,...
12 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, May 11th, 2023
– देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, मुंबई, (११ मे) – उद्धव ठाकरे यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर मु‘यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. मग भारतीय जनता पार्टीबरोबर निवडणूक लढवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवताना आपण आपली नैतिकता कोणत्या डब्यात बंद केली होती, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. उद्धव ठाकरे यांनी खुर्चीकरिता विचार सोडला तर एकनाथ शिंदे यांनी विचारांसाठी खुर्ची सोडली. ते सत्तेत...
11 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, May 11th, 2023
नवी दिल्ली, (११ मे) – जदयुचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय मंत्री रामचंद्रप्रसाद सिंह (आरसीपी सिंह) यांनी आज भाजपात प्रवेश केला. आरसीपी सिंह कधीकाळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे विश्वासू नेते होते. मात्र, मतभेद झाल्यानंतर गतवर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांनी जदयुचा राजीनामा दिला होता. सिंह यांनी आज भाजपा मुख्यालयात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रधान यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भाजपा महासचिव अरुणसिंह, माध्यम विभागाचे...
11 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, May 11th, 2023
– नवीन पटनायक यांचा नितीशकुमारांना धक्का, नवी दिल्ली, (११ मे) – पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक बिजू जनता दल तिसर्या आघाडीसोबत नव्हे तर, स्वबळावरच लढणार आहे. आमचा पक्ष नेहमीच स्वबळावर लढला आहे, असे या पक्षाचे प्रमुख आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी गुरुवारी स्पष्ट केले. विरोधकांची आघाडी उभारण्यासाठी भेट घेणार्या नितीशकुमार यांना पटनायक यांनी मोठा धक्का दिला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा भुवनेश्वर येथील दौरा हा सद्भावना दौरा होता आणि...
11 May 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, May 11th, 2023
– नितेश राणे यांचा सवाल, मुंबई, (११ मे) – बिहारचा सुपुत्र अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या खुनामध्ये ज्यांचे हात बरबटलेले आहेत, ज्या प्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहे, अशा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटून तुम्ही घाणेरडे राजकारण करणार की बिहारची अस्मिता टिकवणार, असा सवाल भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी आज गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीशकुमारांना केला. याच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना सुशांतसिंह राजपूत याच्या हत्येचा तपास करायला आलेल्या सीबीआयच्या...
11 May 2023 / No Comment /