|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.46° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 70 %

वायू वेग : 3.79 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.23°C - 31.22°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear

पी. व्ही. सिंधूला कांस्यपदक

पी. व्ही. सिंधूला कांस्यपदकसलग दोन ऑलिम्पिक पदके जिंकण्याचा रचला इतिहास, टोकियो, १ ऑगस्ट – भारताच्या पी. व्ही. सिंधूने रविवारी सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा इतिहास रचला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले असले, तरी तिने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. रविवारी कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओवर २१-१३, २१-१५ अशी मात केली. सिंधूचे हे सलग दुसरे ऑलिम्पिकपदक ठरले. याआधीच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदक पटकावले होते. हैदराबादची २६ वर्षीय पी. व्ही. सिंधू दोन...2 Aug 2021 / No Comment /

हॉकी : ४१ वर्षांनंतर भारत उपांत्य फेरीत

हॉकी : ४१ वर्षांनंतर भारत उपांत्य फेरीतटोकियो, १ ऑगस्ट – मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व सामन्यात ग्रेट ब्रिटनचा ३-१ असा पराभव करीत ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या कामगिरीमुळे ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा वाढली आहे. भारताकडून दिलप्रीतसिंग (७ व्या मिनिटाला), गुरजंतसिंग (१६ व्या) व हार्दिकसिंहने (५७ व्या) तीन मैदानी गोल नोंदवून आठ वेळच्या ऑलिम्पिक विजेत्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ग्रेट ब्रिटनकडून एकमेव गोल सॅम वार्डने ४५ व्या मिनिटाला केला....2 Aug 2021 / No Comment /

सिंधूसह तिघांनी कायम ठेवली पदकांची आशा

सिंधूसह तिघांनी कायम ठेवली पदकांची आशाटोकियो, २९ जुलै – विश्‍वविजेती पी. व्ही. सिंधूने आपली विजयी घोडदौड कायम राखत भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देण्याची आशा पल्लवित ठेवली आहे. मात्र, सहा वेळची विश्‍वविजेती बॉक्सर मेरी कोमचे उप-उपांत्यपूर्व फेरीत आव्हान संपुष्टात आले. भारतीय पुरुष हॉकी संघ व तिरंदाज अतनू दास व बॉक्सर सतीश कुमारने गुरुवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश करून भारताला पदक मिळवून देण्याच्या आशा कायम राखल्या आहेत. गुरुवारी सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डटवर २१-१५,...30 Jul 2021 / No Comment /

महिला स्पर्धकांमुळे वाढल्या पदकाच्या अपेक्षा

महिला स्पर्धकांमुळे वाढल्या पदकाच्या अपेक्षाटोकियो, २५ जुलै – टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला भारत्तोलक मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून इतिहास रचला आणि देशाला पहिले पदक जिंकून दिले. मीराबाईच्या या स्पृहणीय यशामुळे देशात आनंदाची लाट आलीच शिवाय टोकियोतील इतर भारतीय खेळाडूंना विशेषतः महिला खेळाडूंना स्फूरण चढले व त्यांनी भारतीय स्त्रीशक्तीचे शानदार प्रदर्शन करीत विजय नोंदविला. रविवारी बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, बॉक्सर एमसी मेरी कोम आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्राने भारताला आणखी पदक जिंकून देण्याच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. २०१२...26 Jul 2021 / No Comment /

मीराबाई चानूला रौप्यपदक

मीराबाई चानूला रौप्यपदकऑलिम्पिकमध्ये भारोत्तोलनात भारताला पहिले पदक; देशभरात आनंद, टोकियो, २४ जुलै – २१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मीराबाई चानूने भारताला भारोत्तोलनात टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले रौप्यपदक मिळवून दिले. मीराबाईने आपल्या शक्तीचा उत्तम वापर करीत देशाला रौप्यपदक मिळवून दिले. या पदकासोबतच भारताने ऑलिम्पिकच्या पदकतालिकेत खाते उघडले असून, भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. मीराबाईच्या अभिमानास्पद कामगिरीमुळे देशात आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मीराबाईचे अभिनंदन...25 Jul 2021 / No Comment /

कांगारूंचे गर्वहरण!

कांगारूंचे गर्वहरण!ब्रिस्बेन कसोटीसह बॉर्डर-गावस्कर मालिकाही भारताने जिंकली, ब्रिस्बेन, १९ जानेवारी – विराट कोहलीची अनुपस्थिती, मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजाची गैरहजेरी, मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंकडून खेळला जाणारा ‘माईंड गेम’, केले जाणारे वर्णद्वेषी हल्ले, मैदानाबाहेरून ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून होणारी शिवीगाळ या सगळ्या अडचणींवर मात करत भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीच्या भरवशावर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूळ चारत कसोटी सामन्यांचा बॉर्डर-गावस्कर चषक २-१ ने जिंकून इतिहास घडवला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रसार...20 Jan 2021 / No Comment /

रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ ‘अजिंक्य’!

रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ ‘अजिंक्य’!मेलबर्न, २९ डिसेंबर – बॉर्डर-गावस्कर चषकातील पहिल्या कसोटी सामन्यात नामुष्कीच्या पराभवाचा सामना करावा लागल्यानतंर दुसर्‍या कसोटी सामन्यात कांगारूंचा आठ गड्यांनी पराभव करत ‘रहाणे’च्या नेतृत्वातील भारतीय संघ ‘अजिंक्य’ ठरला आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाचा डाव समाप्त झाल्यानंतर भारतापुढे ७० धावा काढण्याचे आव्हान होते, जे भारताने दोन गडी गमावून लीलया पेलले आणि दुसरा कसोटी सामना खिशात घातला. भारतीय गोलंदाजांनी केलेली दमदार कामगिरी आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात काढलेल्या शतकामुळे मिळालेली १३१ धावांची मजबूत...30 Dec 2020 / No Comment /

विराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

विराट कोहली दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूदुबई, २८ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला दशकाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे. या दशकात तिन्ही स्वरूपात कोहलीच्या दमदार कामगिरीच्या पृष्ठभूमीवर आयसीसीने त्याचा ‘सर गारफिल्ड सोबर्स’ म्हणजेच ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटिअर ऑफ द डिकेड्‌स’ या पुरस्काराने गौरव केला आहे. आयसीसी पुरस्कारांच्या या कालावधीत कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने या काळात सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतकेही ठोकली आहेत. या दशकात कोहलीने...28 Dec 2020 / No Comment /

मॅराडोनामुळे जगाला पडली फुटबॉलची भुरळ!

मॅराडोनामुळे जगाला पडली फुटबॉलची भुरळ!२० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ब्युनर्स आयस, २६ नोव्हेंबर – जागतिक फुटबॉल जगतातील ‘मॅराडोना’ नावाचा झंझावात बुधवारी शांत झाला. आपल्या उत्स्फूर्त आणि जोमदार आक्रमक खेळाच्या बळावर मॅराडोना जगातील फुटबॉलप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला. त्याच्यामुळे जगाला फुटबॉलची भुरळ पडली. मॅराडोनाचा जन्म अर्जेंटिनातील लॅनस येथे ३० ऑक्टोबर १९६० रोजी झाला होता. अर्जेंटिनाचा हा स्टार फुटबॉलपटू १९८० च्या दशकातील सर्वोत्तम फुटबॉलपटू व जगातला सदासर्वकाळातील सर्वोत्तम फुटबॉलपटूपैकी एक होता. जागतिक फुटबॉल महासंघाने आभासी माध्यमातून मतदान...26 Nov 2020 / No Comment /

सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली

सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहलीराजकोट, [१४ नोव्हेंबर] – अत्यंत कठिण पस्थितीत सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात आहे. त्यामुळे टिकाकारांना कोणतीही टिका करण्याची संधीच नाही असे परखड मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. इंग्लंडविरुध्दची पहिली कसोटी अनिर्णीत सुटल्यानंतर विराट कोहली पत्रकारांशी बातचित करीत होता. भारताचे एक-एक गडी तंबूत परतत असताना भारतावर पराभवाचे ढग पसरले होते. पण त्या प्रतिकूल स्थितीतही कर्णधार कोहलीने दुसर्‍या डावात नाबाद ४९ धावांची लढवैया खेळी केली. रवीन्द्र जडेजा याने चांगली...15 Nov 2016 / No Comment /

ईडन गार्डन्सवर भारताने पाकला लोळविले

ईडन गार्डन्सवर भारताने पाकला लोळविले=‘विराट’ विजय= कोलकाता, [१९ मार्च] – सध्या सुपर फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीचे शानदार अर्धशतक (नाबाद ५५) आणि त्याने युवराजसोबत चौथ्या गड्यासाठी केलेल्या ६१ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने चुरशीच्या व उत्कंठापूर्ण लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १३ चेंडू शिल्लक असताना सहा गड्यांनी पराभव करून टी-२० स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यात यश मिळविले. भारताने विजय मिळवताच देशभरात आनंदाला उधाण आले आणि एकच जल्लोष साजरा झाला. बांगलादेशात झालेल्या आशिया चषकातही विराटने भारताला विजय मिळवून दिला...20 Mar 2016 / No Comment /

महालढतीत भारताची बाजी, पाकचा पराभव

महालढतीत भारताची बाजी, पाकचा पराभव=विराट कोहली सामनावीर= मीरपूर, [२७ फेब्रुवारी] – जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेल्या आशिया चषक स्पर्धेतील अत्यंत उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानचा २७ चेंडू शिल्लक असताना पाच गड्यांनी पराभव केला आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील पाकवरील आपले वर्चस्व अबाधित राखले. सलग दुसर्‍या विजयासह भारताने दोन गुणांची कमाई केली. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी घालण्यात आलेली बंदी उठवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार्‍या मोहम्मद आमिरने रोहित शर्मा (०), अजिंक्य रहाणे (०)...28 Feb 2016 / No Comment /