किमान तापमान : 28.54° C
कमाल तापमान : 29.51° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 72 %
वायू वेग : 4.34 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.51° C
28.31°C - 30.52°C
broken clouds27.79°C - 31.42°C
light rain27.78°C - 30.14°C
sky is clear27.22°C - 30.08°C
sky is clear27.13°C - 29.97°C
sky is clear26.87°C - 29.96°C
sky is clearगुवाहाटी, [१२ फेब्रुवारी] – आसाम महानगर पालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली असून एकूण ३४० प्रभागांवर विजय मिळविला आहे. दिल्लीतील दारुण पराभवामुळे निराश झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांना आसाममधील दणदणीत विजयामुळे दिलासा मिळाला आहे. याबरोबरच ३० म्यूनिसिपल बोर्ड आणि नगर परिषदांवरही भाजपाचा झेंडा फडकला आहे. ७४३ पैकी ७०२ प्रभागांचे निवडणूक निकाल घोषित करण्यात आले. गोलाघाट आणि सिल्चरचे निकाल मात्र येणे बाकी आहेत, असे आसाम राज्य निवडणूक आयुक्त एच. एन. बोरा यांनी सांगितले.
भाजपाने ३४० प्रभागांवर दणदणीत विजय मिळविला असून कॉंग्रेसला २३२, आसाम गण परिषदेला ३९, एआययुडीएफला ८, एनसीपीपीला ४, बीपीएफ आणि सीपीएमला प्रत्येकी एक तर ७७ जागी अपक्षांनी विजय मिळविला आहे. एकूण ७४ म्युनिसिपल बोर्ड आणि समित्यांपैकी ३० ठिकाणी भाजपाला बहुमत मिळाले आहे. तर कॉंग्रेसला १७, आगपला दोन आणि राकॉंला एका ठिकाणी बहुमत मिळाले आहे. पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा हा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.