किमान तापमान : 27.83° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.11 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
26.59°C - 29.99°C
few clouds26.46°C - 29.47°C
scattered clouds26.37°C - 28.96°C
scattered clouds25.41°C - 28.55°C
sky is clear25.42°C - 28.82°C
sky is clear25.55°C - 29°C
sky is clear=बँका घेणार शुल्काच्या नक्की आकड्याचा निर्णय=
नवी दिल्ली, (३ जानेवारी) – बँकेत जाऊन, रांगेत लागून पैसे काढण्याची पद्धत आपण एटीएम मशिन्समुळे पार विसरूनच गेलो आहोत. पण, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आगामी निर्णयामुळे पुन्हा एकदा आपल्यावर बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लावण्याचीच वेळ येणार आहे. एटीएममधून पैसे काढणार्या ग्राहकांकडून निश्चित शुल्क वसूल करण्याचे अधिकार बँकांना देण्याचा विषय आरबीआयच्या विचाराधीन आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर के.सी. चक्रवर्ती यांनी एटीएम सेवेसाठी बँका शुल्क वसूल करणार असतील,तर आरबीआयला आक्षेप राहणार नाही, असे विधान केले आहे. सध्या असा प्रस्ताव आपल्यापुढे आला नसला तरी असे शुल्क आकारण्यास बँकांना परवानगी देता येणार आहे. ‘सध्या विविध बँकांचे एटीएम वापरात असून बँकांमध्ये असलेल्या स्पर्धेनुसार त्यांनी ही कर आकारणी करावी. याबाबतीत हाच निर्णय आदर्श ठरणार आहे,’असे मत त्यांनी मांडले.
बंगळुरूमध्ये गेल्या वर्षी एका महिलेवर एटीएम केंद्रात पैसे काढताना झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, बँकांनी एटीएम केंद्रांच्या चोवीस तास सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, हे सगळे फारच खर्चिक असल्याने बँका त्यासाठी तयार नाहीत. काही बँकाचे पदाधिकारी या प्रस्तावावर विचार करीत असून सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी एटीएमचा वापर करणार्यांकडूनच रक्कम वसूलण्यात येणार असल्याचे चित्र दिसत आहे. शिवाय, काही बँकांच्या मते ठराविक काळातच सुरक्षा देण्यात यावी.याविषयी देशातील बँकांची सर्वोच्च संघटना आयबीएसोबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
जादा शुल्क भरून एटीएमचा वापर करायचा किंवा बँकेत रांग लावण्याची जुनी पद्धत अवलंबायची आहे,हे आता ग्राहकावर अवलंबून आहे.