किमान तापमान : 28.01° C
कमाल तापमान : 28.66° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 67 %
वायू वेग : 2.17 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.66° C
28.38°C - 31.22°C
few clouds27.91°C - 30.32°C
sky is clear27.33°C - 30.31°C
sky is clear27.26°C - 30.1°C
sky is clear26.95°C - 30.15°C
sky is clear27.31°C - 30.25°C
sky is clearमुंबई, [१३ मे] – तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने २००९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हिंदू दहशतवादाचा भ्रम निर्माण करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह यांना २००८ साली अटक करून मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात गोवले होते. परंतु, राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव वगळले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीने निर्माण केलेला हिंदू दहशतवादाचा बुडबुडा फुटला आहे, असे मत पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले.
भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना माधव भांडारी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, २००८ साली मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने साध्वी प्रज्ञासिंह या एका भगवी वस्त्रे नेसणार्या निरपराध साध्वीस पकडून तुरुंगात टाकले व त्याच्या आधारे हिंदू दहशतवादी असल्याचा अपप्रचार चालविला. २००९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुसाठी हे घाणेरडे राजकारण केले गेले. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी भगवा दहशतवाद असा शब्दप्रयोग रुजविण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारच्या घडामोडीमुळे कॉंग्रेसी राज्यकर्त्यांनी निर्माण केलेला हिंदू दहशतवादाचा बुडबुडा फुटला आहे. एनआयएने आज दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रासह एकूण खटल्याची सुनावणी होईल त्यावेळी साक्षी पुरावे समोर येतील व सत्य बाहेर येईल.
मालेगावच्या एका बॉम्बस्फोट खटल्यात न्यायालयाने २५ एप्रिल रोजी काही तरुणांची निर्दोष मुक्तता केली. तपास यंत्रणांच्या कामात आधीच्या सरकारप्रमाणे हस्तक्षेप करणे भाजपाने टाळले आहे व तपास यंत्रणांना मुक्तपणे काम करता येत आहे हे आता दिसून येत आहे. यापूर्वी देशात व राज्यात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार होते, तर राज्यातील गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात होते. अर्थात या दोन्ही पक्षांनी दहशतवादविरोधी पथक किंवा पोलिसांना राजकीय कारणासाठी गैरवापर केला होता, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.