किमान तापमान : 28.61° C
कमाल तापमान : 29.53° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 67 %
वायू वेग : 4.39 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.53° C
27.81°C - 31.08°C
sky is clear27.9°C - 31.07°C
sky is clear28.34°C - 31.49°C
sky is clear28.53°C - 32.83°C
sky is clear29.1°C - 32.6°C
few clouds28.64°C - 31.99°C
sky is clearमुंबई, [२० फेब्रुवारी] – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, कामगार व शोषित वर्गासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे व डाव्या चळवळीचे अध्वर्यू गोविंदराव पानसरे यांचे शुक्रवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. शनिवारी सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव कोल्हापूर येथे नेण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
गोविंदराव पानसरे व त्यांची पत्नी उमा यांच्यावर गेल्या सोमवारी सकाळी कोल्हापुरात त्यांच्या घरासमोरच प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. यात पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. कोल्हापूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर तातडीने दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शस्त्रक्रियांनंतर पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, गुरुवारी त्यांच्या फुफ्फुसाला सूज आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्याबाबत विचार सुरू होता व त्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी त्यांना कोल्हापूर येथून एअर ऍम्ब्युलन्सने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात हलविण्यात आले. पानसरे यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाल्याने पुन्हा डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. अथक परिश्रम करूनही डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. रात्री उशिरा त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली.
गोविंदराव पानसरे हे परिवर्तनवादी चळवळीतील मोठे नाव होते. विवेकवादावर भर देणारे, बुद्धिप्रामाण्य मानणारे पुरोगामी विचारवंत म्हणून त्यांची ख्याती होती. शालेय जीवनात राष्ट्र सेवादलाकडे त्यांचा ओढा होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांनी कामगार, शेतकरी, मजूर व असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी सातत्याने आंदोलन केले. विविध क्षेत्रातील एकूण १५ संघटना त्यांनी स्थापन केल्या होत्या. गोविंदराव पानसरे यांनी ऊस तोडणी कामगार आणि कष्टकरी स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून सातत्याने संघर्ष केला. राज्य सरकारच्या गरिबांसाठी असलेल्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून त्यांनी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले. गोविंदराव पानसरे यांनी जवळपास २१ पुस्तके लिहिली आहेत. भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर आज पानसरे यांचीही तशाचप्रकारे हत्या झाल्याने महाराष्ट्राला धक्का बसला आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी गोविंदाव पानसरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील, सुप्रिया सुळे, खा. राजू शेट्टी, रिपाइं नेते रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी पानसरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.