किमान तापमान : 30.82° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 75 %
वायू वेग : 4.7 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.15°C - 32.99°C
sky is clear28.25°C - 31.92°C
broken clouds28.02°C - 30.8°C
sky is clear27.16°C - 29.49°C
sky is clear26.7°C - 29.92°C
light rain27°C - 29.53°C
sky is clear= ४८०० कोटींची केंद्राची मदत ७ दिवसात : फडणवीस=
नवी दिल्ली, [१० जानेवारी] – राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी केंद्राकडे ४८०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, ही राशी पुढच्या आठवड्यात देण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
भाजपाच्या मेळाव्यासाठी दिल्लीत आले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय आपत्तीनिवारण समितीचे प्रमुख राजनाथसिंह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्र सदनात पत्रकारांशी बोलतांना फडणवीस म्हणाले की, दुष्काळ निवारणासाठी आवश्यक असलेल्या मदतीची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्र पाठवून केली होती. ही राशी तातडीने राज्य सरकारला मिळण्याबाबतची मागणी मी राजनाथसिंह यांच्याकडे केली. त्यावर पुढच्या आठवड्यात ही राशी मिळेल, असे आश्वासन राजनाथसिंह यांनी आपल्याला दिले आहे.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाऐवजी इंडो तिबेट बॉर्डर सिक्युरिटी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आयटीबीपीच्या कंपन्यांची आणि त्यातील जवानांची संख्या तेवढीच असली पाहिजे, त्यात कपात करण्यात येऊ नये, अशी मागणी आपण यावेळी राजनाथसिंह यांच्याकडे केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
सागरी रस्त्यास लवकरच परवानगी मिळेल
मुंबईतील सागरी रस्त्यास लवकरच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांनी आज इंदिरा पर्यावरण भवनात पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. सागरी रस्त्याला परवानगी देण्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितले. सागरी रस्त्याला परवानगी देण्याबाबत अडथळा ठरणार्या सीझेडआर नियमात दुरुस्ती करण्याबाबत आपले मंत्रालय अनुकूल आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
सागरी रस्ते ही आता मुंबईची गरज झाली आहे. मात्र या रस्त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही, तसेच या मार्गावर इमारत बांधकामांना कोणत्याही स्थितीत परवानगी दिली जाणार नाही, यासाठी कायदाही केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
नरीमन पॉईंट ते मालाड कांदिवली हा ३६ किमीचा सागरी मार्ग बांधण्यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्तीही करण्यात आली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.