किमान तापमान : 29.19° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 3.73 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.05°C - 31°C
sky is clear28.2°C - 30.91°C
few clouds27.87°C - 30.83°C
sky is clear28.13°C - 31.48°C
few clouds28.77°C - 33.14°C
sky is clear29.13°C - 32.78°C
sky is clearमुंबई, [१ फेब्रुवारी] – महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्डने) मोठा दिलासा दिला आहे. कृषी विकासाला गती देण्यासाठी नाबार्डने येणार्या आर्थिक वर्षात १.८० लाख कोटी रुपयांचे कर्ज द्यायचे ठरविले आहे.
नाबार्डने यासाठी एक कार्यक्रम तयार केला असून, त्यासाठी लागणारा निधीही राखून ठेवला आहे. हा निधी चालू आर्थिक वर्षाच्या निधीपेक्षा (९,२३४ कोटी) जास्त आहे. मागच्या महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नाबार्डच्या मंडळासमोर बोलताना ग्रामीण भागातील गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने सुतोवाच केले होते. भविष्यात अन्नधान्याची वाढती गरज लक्षात घेता नाबार्डने कृषी विभागाकडे विशेष लक्ष द्यावे, असेही जेटली तेव्हा म्हणाले होते.
अर्थमंत्र्यांनी केलेली सूचना विचारात घेऊन नाबार्डने पावले टाकण्यास सुरुवात केली असून, कृषी क्षेत्रासाठी ही दिलासादायक बाब असल्याची भावना महाराष्ट्रातील शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.