|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.22° C

कमाल तापमान : 31.07° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 61 %

वायू वेग : 4.91 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.07° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 31.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.79°C - 31.42°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.78°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.22°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.13°C - 29.97°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.87°C - 29.96°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, विज्ञान भारती » पाणी संपताच बाटलीही होईल गायब

पाणी संपताच बाटलीही होईल गायब

=विज्ञान जगतात नवा शोध=
water bottleमुंबई , [३० मार्च] – सार्वजनिक ठिकाणी कचर्‍यामध्ये ढिगाने दिसणार्‍या रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांमुळे पर्यावरणाला हानी पोहोचते, हे माहीत असूनही अशा बाटल्यांचे करायचे काय, याचे उत्तर न सापडल्याने अनेकजण रस्त्यात त्या बाटल्या फेकून देतात. आता मात्र पाणी प्यायल्यानंतर बाटली आपोआप नष्ट होईल, अशा बाटल्या विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.
आईसलॅड ऍकाडमी ऑफ आर्ट्समध्ये प्रॉडक्ट डिझाईन ऍण्ड आर्किटेक्चर शिकणार्‍या ऍरी जॉन्सन या विद्यार्थ्याने अशाप्रकारची एक अभिनव बाटली विकसित केली आहे. या बाटलीतील पाणी संपले की ती आपोआपच नष्ट होते. शेवाळापासून बनणार्‍या पावडरपासून बनवण्यात आलेली ही बाटली असून ही पावडर पाण्याच्या संपर्कात आली की एक प्रकारची जेली तयार होते. त्यापासूनच ही बाटली बनवण्यात आली आहे. या बाटलीतील पाणी संपले की बाटली आपोआप आकुंचन पावते आणि नष्ट होते.
प्लास्टिक नष्ट होण्यासाठी, त्याचे विघटन होण्यासाठी किमान साडेचारशे ते हजारो वर्षे लागतात. त्या तुलनेत प्लास्टिकची निर्मिती मात्र थक्क करणार्‍या वेगाने होत आहे. प्लास्टिकचा अनिर्बंध वापर हा शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञांसाठी मोठा काळजीचा विषय आहे. पण त्यावर काही प्रमाणात का होईना मात करणे आता शक्य होणार आहे.
जगभरात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची ज्या प्रमाणात निर्मिती होते आणि त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम पाहून ऍरीला या विषयावर काम करावेसे वाटले. विशिष्ट प्रकारच्या शेवाळापासून बनवलेली पावडर पुन्हा पाण्याच्या संपर्कात आली तर जेलीसारखी बनते आणि त्याला हवा तो आकार देता येतो, हे त्याला समजले. त्यानंतर त्याने या जेलीला पिण्याच्या पाण्याच्या बाटलीसारखा आकार दिला. हे सर्व करताना जेली पाण्याबाहेर येणार नाही, हे पाहिले. म्हणजेच ही शेवाळापासून बनलेली जेली पाण्याबाहेर आली की सुकते. त्यानंतर पुन्हा त्याची पावडर होते.
शेवाळ हे पूर्णपणे सेंद्रीय म्हणजे नैसर्गिक आणि डिस्पोजेबल असल्यामुळेच त्याने यावर प्रयोग केले. अर्थातच बाटलीतील पाणी संपले की नष्ट होणारी ही बाटली अजून पूर्णपणे प्राथमिक अवस्थेत असून ऍरीने फक्त एक दिशा दाखवली आहे. मात्र, अद्याप या संकल्पनेचा व्यावसायिक वापर सुरू झालेला नाही.

Posted by : | on : 31 Mar 2016
Filed under : ठळक बातम्या, विज्ञान भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g