किमान तापमान : 28.54° C
कमाल तापमान : 29.51° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 72 %
वायू वेग : 4.34 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.51° C
28.31°C - 30.52°C
broken clouds27.79°C - 31.42°C
light rain27.78°C - 30.14°C
sky is clear27.22°C - 30.08°C
sky is clear27.13°C - 29.97°C
sky is clear26.87°C - 29.96°C
sky is clearनागपूर, [२६ सप्टेंबर] – राज्यात निर्माण झालेल्या निराळ्या स्थितीचा विचार करता, भाजपा व सहकारी घटकपक्ष यांच्या भाजपा महायुतीच्या माध्यमातून येती विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र भाजपा महायुतीच्याच बाजूने वातावरण दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत मिळेल व ती सत्तास्थानी विराजमान होईल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर सिव्हिल लाईन येथील प्रचार कार्यालयात शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मागील आठवड्यातील घटनाक्रमानंतर आम्ही भाजपा व आमचे मित्रपक्ष यांच्यासोबत महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक लढण्याचा मार्ग निवडला आहे. या निवडणुकीत राज्यातील जनता जात, पात, धर्म, संप्रदाय या बाबींना फाटा देत विकासाच्या अजेंड्यावर मतदान करेल. त्यात बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता, शेतकर्यांसाठी योजना, वंचित घटकांना न्याय तसेच भ्रष्टाचाराचा विरोध आदी विषयांवर मतदान होईल. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करेल, असा विश्वास देखील आ. फडणवीस यांनी व्यक्त केला.
केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यास विकास योजना तसेच निधीचे वाटप अधिक योग्य पद्धतीने व उपयोगी सिद्ध होते, ही बाब आता जनतेला पटली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. येत्या एक-दोन दिवसांत घटक पक्षातील जागावाटपाचा निर्णय अंतिम होईल तसेच रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांच्याशी सध्या मुंबईत चर्चा सुरू आहे. त्यावर देखील अंतिम निर्णय लवकरच होईल.
रिपाई नेते रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद देण्यात यावे अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. त्यासाठी प्रदेश समितीने केंद्रीय समितीकडे यासंदर्भात शिफारस केली असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी आ. सुधाकरराव देशमुख, आ. अनिल सोले आदी उपस्थित होते.
राकॉंसोबत युतीचे त्रिवार खंडन
सध्या निर्माण झालेल्या स्थितीत भाजपाची राकॉंशी युती होईल का असे विचारले असता, भाजपाने आजवर सर्वाधिक संघर्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी केला आहे. त्यामुळे राकॉंसोबत युती होणे शक्य नसल्याचे सांगत, या चर्चेचे त्रिवार खंडन केले आहे.