किमान तापमान : 28.03° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 89 %
वायू वेग : 1.64 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
27.9°C - 31.39°C
few clouds28.42°C - 31.46°C
overcast clouds27.73°C - 30.52°C
few clouds26.75°C - 29.34°C
sky is clear26.55°C - 29.19°C
light rain26.84°C - 29.17°C
scattered clouds=आठ जिपंवर कॉंग्रेस विजयी=
जयपूर, [६ फेब्रुवारी] – राजस्थानातील चुरशीच्या पंचायत निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपाने १७ जिल्हा परिषदांवर झेंडा फडकविला असून, ८ जिल्हा परिषदांवर कॉंग्रेस विजयी झाली आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीचे काम अजुनही सुरू आहे.
राज्यात एकूण ३३ जिल्हा परिषदांपैकी २५ जिल्हा परिषदांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. यात १७ ठिकाणी भाजपा तर ८ ठिकाणी कॉंग्रेसने विजय मिळविला असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने दिली. ८ जिल्हा परिषदांचे निकाल अद्याप घोषित व्हायचे आहेत.
जिल्हा परिषदांच्या अनुक्रमे ४८३ आणि ३१४ जागांवर भाजपा व कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले, तर ९ जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. एकूण १०१४ नगरसेवकांच्या जागांपैकी ८१६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर पंचायत समितीच्या एकूण ६२२६ जागांपैकी ६०६५ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यापैकी भाजपाने २९६२, तर कॉंग्रेसने २४९२ जागांवर विजय संपादन केला आहे. मतमोजणीला आज शुक्रवारी प्रारंभ झाला.