किमान तापमान : 31.03° C
कमाल तापमान : 33.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 6.97 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.99° C
28.05°C - 33.99°C
few clouds28.12°C - 30.79°C
sky is clear27.62°C - 30.6°C
sky is clear28.38°C - 31.86°C
few clouds28.92°C - 33.1°C
sky is clear29.22°C - 32.93°C
few clouds=हवामान खात्याचा अंदाज=
मुंबई, [१० सप्टेंबर] – राज्यात गेल्या काही दिवसापांसून पावसाने दांडी मारल्यामुळे दुष्काळ पडला आहे. मात्र येत्या चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं पावसाला अनुकूल वातावरण तयार झालं आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, असे भारतीय हवामान खात्याचे महासंचालक एल.एस. राठोड यांनी सांगितले आहे. या पावसामुळे खरीप पीक वाचण्यास मदत मिळणार असून वर्षभराच्या पाण्याच्या प्रश्नांची तीव्रता कमी होणार आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता आहे. तर काही भागात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. तासभर कोसळलेल्या पावसानं काही प्रमाणात का होईना सगळीकडे गारवा निर्माण झाला आहे. कोकण, पुणे, शिर्डी, नाशिक या भागातही पावसाचे आगमन झाले आहे.