|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.01° C

कमाल तापमान : 28.66° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 67 %

वायू वेग : 2.17 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.66° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.38°C - 31.22°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » आसाम-ईशान्य भारत, ठळक बातम्या, राज्य » ‘रिमोट कंट्रोल’मुळे संपूर्ण देश त्रस्त

‘रिमोट कंट्रोल’मुळे संपूर्ण देश त्रस्त

=आसाम वाचावा, ही अपेक्षा: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कॉंग्रेसला लक्ष्य=

Prime Minister Narendra Modi addressing the gatherings during Vijay SanKalp Samabesh at TinsuKia in Assam on Saturday.  PHOTO:REBA KUMAR BORAH

Prime Minister Narendra Modi addressing the gatherings during Vijay SanKalp Samabesh at TinsuKia in Assam on Saturday. PHOTO:REBA KUMAR BORAH

राहा (आसाम), [८ एप्रिल] – बॅकसीट ड्रायव्हिंग आणि रिमोट कंट्रोलमुळे संपूर्ण देश त्रस्त झाला आहे, आसाम मात्र यातून वाचला पाहिजे. आसामच्या जनतेने अस्थिर सरकारपासून स्वत:ला वाचवले पाहिजे, असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका प्रचार सभेत कॉंग्रेसला लक्ष्य केले.
आसाममधील या निवडणूक प्रचार सभेला संबोधताना मोदींनी कॉंग्रेसपक्षावर चांगलेच टीकास्त्र सोडले. आसाममध्ये अफवा पसरवून येथील सरकार अस्थिर करणार्‍या आणि विकासाच्या मुद्यावर कांगावा करणार्‍या पक्षाऐवजी बहुमताने भाजपाच्याच उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित आसामच्या जनतेला केले.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंगांच्या, आमचे सरकार बोलण्यापेक्षा कामावर अधिक भर देते या विधानावर निशाणा साधत पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटले की, मनमोहनसिंग जे म्हणाले ते अगदी खरे आहे, कारण सिंगांनी त्यांच्या कार्यकाळात केलेले घोटाळे आता बोलू लागले आहेत. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसच्या कार्यकाळात बॅकसीट ड्रायव्हिंग आणि रिमोट कंट्रोलमुळे चालणार्‍या सरकारमुळेच देश त्रासून गेला होता. आता आसामलाही अशा बॅकसीट ड्रायव्हिंगमुळे झटका हवा आहे का, असा सवाल करत त्यांनी, आसामच्या जनतेला म्हटले की, कॉंग्रेसला या देशात काहीही रस नाही, त्यामुळेच रिमोट कंट्रोल अन्य कोणाच्याही हातात तुम्ही देऊ नका, असे आवाहनही मोदी यांनी केले.
आसाममध्ये कॉंग्रेसच्या काळात झालेल्या शारदा चीट फंड घोटाळ्याचा मुद्दा यावेळी पहिल्यांदाच मोदींनी प्रचारसभेत मांडला. या घोटाळ्यासारखे अन्य घोटाळे भविष्यात होऊ नयेत यासाठीच आम्ही जनधन योजना सुरू केली आहे, असे सांगून त्यांनी, शारदा घोटाळ्यातील दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

Posted by : | on : 9 Apr 2016
Filed under : आसाम-ईशान्य भारत, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g