|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.14° C

कमाल तापमान : 32.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 58 %

वायू वेग : 3.57 Mps

स्थळ : Mumbai, IN

32.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.31°C - 32.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

28.15°C - 31.32°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.76°C - 29.9°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.37°C - 30.01°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.04°C - 29.82°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.7°C - 29.86°C

sky is clear
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नका

वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नका

=वाद अधिकारांचा, राजनाथसिंहांचा केजरीवाल, सिसोदियांना सल्ला=
RAJNATH SINGHनवी दिल्ली, [१५ जून] – दिल्लीत प्रशासन चालविताना अधिकारांच्या न्यायालयीन लढाईत झटका बसल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज सोमवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेतली आणि सरकारशी संबंधित विविध मुद्यांवर चर्चा केली. वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नका, असा सल्ला राजनाथसिंह यांनी या भेटीत केजरीवालांना दिला.
दिल्लीचा राज्यकारभार चालविण्याबाबत केंद्र सरकारने जी नियमावली जारी केली आहे, ती राज्यघटनेनुसार आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीच्या कायद्यानुसारच असल्याने, दिल्ली सरकारने वारंवार संघर्षाची भूमिका घेऊ नये. या वादातून काहीच साध्य होणार नाही. कायदा व घटनेने लोकनियुक्त सरकारला जे अधिकार दिले आहेत, त्याच चौकटीत राहून सरकारने काम करायला हवे, असे राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यासोबत विविध मुद्यांवर निर्माण झालेल्या वादाचा विषयही केजरीवालांनी उपस्थित केला. अधिकार्‍यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचे सर्व अधिकार नायब राज्यपालांकडेच असल्याने आपल्या सरकारला काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी तक्रारही केजरीवालांनी राजनाथसिंह यांच्याकडे केली.
सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सरकारचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आवश्यक ते सहकार्य करावे, अशी विनंती केली. नायब राज्यपालांसोबत नेहमीच वाद होत असल्याने, त्याचा थेट परिणाम सरकारच्या कामकाजावर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्ली सरकार आणि नायब राज्यपालांमध्ये निर्माण झालेला वाद सलोख्याने सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सहकार्य करावे, असे आवाहनही केजरीवालांनी केले.

Posted by : | on : 16 Jun 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g