किमान तापमान : 28.44° C
कमाल तापमान : 29.99° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 4.59 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.99° C
26.59°C - 29.99°C
broken clouds26.4°C - 29.57°C
few clouds26.26°C - 28.74°C
few clouds25.44°C - 28.53°C
sky is clear25.35°C - 28.88°C
sky is clear25.62°C - 29.09°C
scattered clouds=सर्व जागा महायुतीलाच मिळणार=
मुंबई, [८ जानेवारी] – पृथ्वीराज चव्हाण, विनोद तावडे आणि आशीष शेलार हे विधानसभेवर निवडून गेल्याने आणि विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी येत्या ३० जानेवारी रोजी पोटनिवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.
आयोगाने गुरुवारी निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. सत्ताधारी भाजपा-शिवसेनेकडे दोन्ही पक्षांचे मिळून १८५ आणि किमान दहा अपक्ष असे मोठे संख्याबळ असल्याने चारही जागांवर युतीचेच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येऊनही पुरेशी संख्या नसल्याने त्यांचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही.
यापैकी पृथ्वीराज चव्हाण व विनायक मेटे यांच्या रिक्त जागेसाठी एकदम मतदान होणार असून, निवडून येण्यासाठी विधानसभेच्या किमान ९६ आमदारांची पहिल्या पसंतीची मते मिळवावी लागतील. अन्य दोन रिक्त जागांसाठी होणार्या स्वतंत्र मतदानात निवडून येणार्या उमेदवाराला १४४ आमदारांचे पाठबळ आवश्यक ठरेल. सध्या भाजपा-शिवसेना तसेच अपक्ष असे किमान १९५ सदस्यांचे मोठे संख्याबळ असल्यामुळे विरोधी पक्षांना एकही जागा मिळण्याची शक्यता नाही. मात्र, आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना स्थान दिल्यास त्यांना तीन जागा द्याव्या लागतील तर एक जागा शिवसेनेला सोडावी लागेल. त्यामुळे महायुतीच्या या जुळवाजुळवीमध्ये भाजपा सदस्याला परिषदेत संधी मिळणार नसल्याचे चित्र दिसत आहेत. शिवसेनेकडून एका जागेवर उद्योगमंत्री सुभाष देसाई हेच उमेदवार असतील, यात शंका नाही. सध्या रामदास आठवले यांचा रिपाइं आणि रासपच्या महादेव जानकारांना दुसरी जागा मिळू शकते. चौथ्या जागेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत यांचा विचार होऊ शकतो. आगामी मंत्रिमंडळाच्या विस्तारात मित्रपक्षांचा समावेश केल्यास भाजपाच्या वाट्याच्या जागा मित्रपक्षांना द्याव्या लागणार आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणुकीसाठी आघाडी करून काही अपक्षांना हाताशी धरले तरीही त्यांना पराभव पत्करावा लागणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणुकीची अधिसूचना येत्या १३ जानेवारीला जारी केली जाणार आहे. २० जानेवारी ही उमेदवारी दाखल करण्याची अंतिम तारीख असून, २१ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येईल तर २३ जानेवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. या चार जागांसाठी तीन निवडणुका असल्यामुळे तीन मतपत्रिका असतील. जागांच्या संख्येपेक्षा अधिक अर्ज दाखल झाल्यास ३० जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा तसेच विनायक मेटेंचा कार्यकाळ जुलै २०१६ मध्ये संपत असून, त्या दोन रिक्त जागांसाठी एक निवडणूक होईल. विनोद तावडे यांचा कार्यकाळ एप्रिल २०२०, तर शेलार यांचा जुलै २०१८ पर्यंत आहे. त्या दोन जागांसाठीही स्वतंत्र मतदान होईल. चार जागी नव्याने निवडून येणार्या सदस्यांना त्या त्या पदाचा उर्वरीत कालावधी मिळणार आहे.