किमान तापमान : 29.42° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 3.47 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.35°C - 32.99°C
broken clouds28.22°C - 30.67°C
few clouds27.99°C - 29.27°C
few clouds27.65°C - 29.43°C
few clouds27.43°C - 29.24°C
sky is clear27.09°C - 29.28°C
sky is clear=महिला आयोगाने बजावली नोटीस=
नवी दिल्ली, [४ मे] – स्वच्छ राजकारणाचे धडे देण्याच्या गप्पा करून देशाच्या राजकारणात उतरलल्या आम आदमी पार्टीवरील संकटांची मालिका कमी होण्याऐवजी सातत्याने वाढतच आहे. स्टिंग ऑपरेशन, बंडखोरी, शेतकर्याने पक्षाच्या रॅलीत केलेली आत्महत्या आणि बोगस पदवी यासारख्या प्रकरणांतून अजूनही बाहेर न आलेल्या आम आदमी पार्टीचे सर्वात विश्वसनीय नेते कुमार विश्वास आता नव्या वादात अडकले आहेत. एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप विश्वास यांच्यावर करण्यात येत असून, यामुळे या महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काळात अमेठी मतदारसंघात कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी ही महिला आली होती. त्या काळात तिची कुमार यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर या महिलेचे कुमार विश्वास यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या प्रकारामुळे तिच्या नवर्यानेही दोन मुलांची आई असलेल्या या महिलेला घराबाहेर काढले. आपली कैफियत मांडण्यासाठी तिने आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनाही पत्र लिहिले. पण, त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही. शिवाय, कुमार यांच्या कार्यालयातील व्यवस्थापकाने तिला फोन करून धमक्याही दिल्या. त्याच्यासोबतचा हा संवाद तिने मोबाईलवर रेकॉर्ड केला असून, तो तिने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे सादर केला आहे.
दरम्यान, आपल्याला आपकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून या महिलेने दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. या प्रकाराची गंभीर दखल घेत आयोगाने कुमार यांना नोटीस बजावली आहे. तक्रारकर्ती महिला ही आपची सक्रिय कार्यकर्ती असल्याने आणि खोट्या आरोपांमुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाला असल्याने कुमार यांनी स्पष्टीकरण द्यायलाच हवे, अशी सूचना आयोगाने केली आहे.
आरोप निराधार
ट्विटरवर आपली बाजू मांडताना कुमार विश्वास यांनी आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले. मला बदनाम करण्यासाठी आणि राजकारणातून बाहेर घालविण्यासाठीच भाजपा आणि कॉंगे्रसने हा कट रचला आहे. पण, मी कोणालाही घाबरणार नाही. राजकारणातील घाण स्वच्छ करण्याचा आमचा निर्धार आहे, असे विश्वास यांनी यात म्हटले आहे.