किमान तापमान : 28.54° C
कमाल तापमान : 28.54° C
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 73 %
वायू वेग : 2.78 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.54° C
28.52°C - 30.83°C
broken clouds28.06°C - 30.87°C
few clouds27.51°C - 29.59°C
broken clouds27.14°C - 29.74°C
scattered clouds26.94°C - 29.67°C
sky is clear26.67°C - 29.76°C
sky is clearवॉशिंग्टन, [२६ नोव्हेंबर] – स्वामी विवेकानंद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या तिघांची कार्यक्षेत्रे निरनिराळी असली आणि ही व्यक्तिमत्त्वे जनमानसात अतिशय लोकप्रिय असली तरी या तिघांमध्ये एक साम्य होते आणि ते म्हणजे त्यांची अफाट स्मरणशक्ती. माणसाच्या स्मरणशक्तीबाबत भरपूर संशोधन झाले असले तरी विस्मृतीबाबत अजून बरेच संशोधन होणे बाकी आहे. आधुनिक माणसाला मात्र जणू विस्मरणाचा रोगच झाला आहे की काय अशी आजची परिस्थिती आहे. स्मृतिभ्रंश, विस्मरण हे शब्द आपण नेहमीच ऐकतो. मात्र, ‘स्मृतींची हानी’ अर्थात विस्मरण ही आनुवंशिक देणगीच असल्याचे शास्त्रज्ञांना नुकत्याच केलेल्या संशोधनातून आढळून आले आहे. अनुवांशिक किंवा वारशाने मिळालेल्या स्मृतीबाबत सध्या जगातील सर्वात मोठे संशोधन हाती घेण्यात आले आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञांची मोठी चमू तयार करण्यात आली आहे. या चमूत बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन (बीयुएसएम) च्या शास्त्रज्ञांचाही समावेश आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=18600