Posted by वृत्तभारती
Saturday, May 14th, 2016
मुंबई, [१३ मे] – तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारने २००९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हिंदू दहशतवादाचा भ्रम निर्माण करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह यांना २००८ साली अटक करून मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात गोवले होते. परंतु, राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रातून साध्वी प्रज्ञासिंह यांचे नाव वगळले आहे. त्यामुळे कॉंग्रेस आघाडीने निर्माण केलेला हिंदू दहशतवादाचा बुडबुडा फुटला आहे, असे मत पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी...
14 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, May 14th, 2016
=अतुलचंद्र कुलकर्णी दहशतवाद विरोधी पथकाचे नवे एडीजी= मुंबई, [१३ मे] – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या केल्या असून, मुंबई पोलिस विभागातील गुन्हे शाखेचे पोलिस सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांना राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी (एडीजी) नियुक्ती देण्यात आली आहे. या पदावर असलेले अप्पर पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलिस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे...
14 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, May 14th, 2016
मुंबई, [१३ मे] – पुढील पाच वर्षांत भारतीय नागरिकांचे सरासरी वय २९ वर्षे असणार आहे. त्यामुळे भारत हा सर्वाधिक युवकांचा देश म्हणून गणला जाणार आहे. संगीत, साहित्य, चित्रपट, कला, क्रीडा या क्षेत्रातील युवारत्न शोधून सह्याद्री वाहिनीने नवरत्न पुरस्कारामध्ये यापुढे युवारत्न पुरस्काराचा समावेश करावा, असे प्रतिपादन राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी काल येथे केले. मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीच्या १५ व्या नवरत्न पुरस्कारांचे राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते रवींद्र नाट्य...
14 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, May 14th, 2016
=दुसर्या कार्यकाळासाठी राजन उत्सुक= लंडन, [१३ मे] – रिझर्व्ह बँकेचा गर्व्हनर म्हणून जबाबदारी पार पाडताना प्रत्येक क्षणाचा आनंद लुटल्याचे रघुराम राजन यांनी म्हटले असून, अजून बरेच काही करायचे बाकी असल्याचे सांगून आपण दुसर्या कार्यकाळासाठी उत्सुक असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येणार असून, सुब्रमण्यम् स्वामी यांच्यासह सत्तारूढ भाजपातील काही घटकांचा रघुराम राजन यांना दुसरा कार्यकाळ देण्यास विरोध आहे, हे विशेष. पोषक वातावरण...
14 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 6th, 2016
=मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकार्यांना आदेश= मुंबई, [५ मे] – राज्यासाठी पुढील दीड ते दोन महिन्यांचा काळ अत्यंत महत्त्वाचा असून या काळात लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, यासाठी प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्याने उपाययोजना राबवाव्यात. टंचाई परिस्थितीत विविध उपाययोजना करता येण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सर्वाधिकार देण्यात आले असून त्याचा उपयोग जनतेला दिलासा देण्यासाठी करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील जिल्हाधिकार्यांना दिले. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत टंचाई निवारणासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात...
6 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 6th, 2016
मुंबई, [६ मे] – परराज्यातून महाराष्ट्रात येणार्या गोवंश मांस (बीफ) विक्रीला मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्याचबरोबर बाहेर राज्यातून येणारे गोवंश मांस बाळगताही येणार आहे, तसेच ते खाण्यासही कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र, त्याचवेळी राज्यात लागू असलेली गोवंश हत्याबंदी कायम राहणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला होता. या कायद्यानुसार गोवंश हत्या, गोमांस...
6 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, May 6th, 2016
मुंबई, [६ मे] – महाराष्ट्र सदन बांधकामाच्या घोटळ्याबाबत सध्या अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक हे माफीचा साक्षीदार बनले आहेत. सुनील नाईक यांना गुरूवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयातील ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. सुनील नाईक हे भुजबळांच्या वांद्रे येथील एज्युकेशन ट्रस्टचे ‘सीए’ होते. त्यामुळे त्यांच्याकडून समीर आणि छगन भुजबळ यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत तपशील...
6 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, May 5th, 2016
कोलकाता, [५ मे] – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज गुरूवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पूर्व मिदनापुर आणि उत्तर बंगालच्या कूच बिहार जिल्ह्यातील २५ मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे. १७० उमेदवारांच भविष्य मतदानपेटीत बंद होणार असून यात १८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. ५८ लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ६७७४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहे. विशेषतः कुचबिहार जिल्हयातील सीमेवरील भागातील रहिवाशी स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मतदानाचा...
5 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, May 5th, 2016
नवी दिल्ली, [४ मे] – गेल्या ९ फेबु्रवारी रोजीच्या कार्यक्रमात अफजल गुरूला श्रद्धांजली वाहताना भारतविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी करण्यात आलेल्या कठोर कारवाईच्या विरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांनी सुरू केलेले आंदोलन बेकायदेशीर असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी आज जाहीर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडण्यासाठी लोकशाही मार्गांचा अवलंब करावा, अशी सूचना कुमार यांनी केली आहे. आम्ही त्यांचे उपोषण बेकायदेशीर ठरवित असून, त्यांनी ते तात्काळ मागे घ्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत....
5 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, May 4th, 2016
नवी दिल्ली, [४ मे] – महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील रखडलेल्या आणि अपूर्ण राहिलेल्या सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ९ हजार १८७ कोटी रूपये देणार आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणार्या महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने मराठवाड्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पासाठी ९० टक्के निधी देण्याची मागणी केली आहे. मात्र ती मागणी अमान्य करत देशातील अपूर्ण प्रकल्पासाठी ८० हजार कोटी रूपये देऊ, त्यापैकी बहुसंख्य निधी महाराष्ट्रासाठी असेल असे आश्वासन केंद्राने राज्य सरकारला दिले...
4 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 3rd, 2016
राज्य शासनाची फेरविचार याचिका स्वीकृत ५ मेच्या परीक्षेबाबत संभ्रम कायमच नवी दिल्ली, [२ मे] – वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी असलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेबाबत (नीट) महाराष्ट्र शासनाने दाखल केलेली फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केली असून, महाराष्ट्रासह आठ राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर उद्या मंगळवारी सुनावणी होऊन अंतिम निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. येत्या ५ मे रोजी ही परीक्षा होऊ घातली आहे. नीट परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अन्यायकारक आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी...
3 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, May 3rd, 2016
=शेतकर्यांच्या उसाला रास्त, किफायतशीर भाव न देणार्या कारखान्यांवर जप्ती= मुंबई, [२ मे] – शेतकर्यांना एफआरपी न देणार्या २० साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय साखर आयुक्तांनी घेतला आहे. तसेच सहा साखर कारखान्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला आहे. या संदर्भातील वृत्त एका खाजगी वृत्तवाहिनीने दिले आहे. या कारवाईमुळे साखर कारखानदारांमध्ये खळबळ उडाली असून सरकारने हा निर्णय मागे घ्यावा म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू होते. शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन अवसायनात...
3 May 2016 / No Comment /