Posted by वृत्तभारती
Tuesday, May 3rd, 2016
नवी दिल्ली, [२ मे] – देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या आणि केंद्रातील सत्तेची किल्ली म्हणून ओळख असलेल्या उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. यावेळी कॉंग्रेसने उपाध्यक्ष राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी वढेरा यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणूनही जाहीर करण्याची व्यूहरचना तयार केल्याचे वृत्त आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने तयारीला लागले आहेत. कॉंग्रेस पक्षही याला अपवाद नाही. राज्यात गेल्या काही वर्षांपासून होत असलेली...
3 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, May 2nd, 2016
=दारू, मादक द्रव्यांचा महापूर= नवी दिल्ली, [१ मे] – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ सेक्स रॅकेटचा अड्डा झाले असून विद्यापीठात दारू आणि मादक द्रव्यांचा विद्यार्थ्यांकडून सर्रास वापर होत असल्याचा धक्कादायक अहवाल नुकताच जाहीर झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ११ प्राध्यापकांनी शिक्षकांनी २०० पानांचा एक अहवाल तयार केला असून विद्यापीठ म्हणजे संघटित सेक्स रॅकेट चालविणारा अड्डा बनल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल २०१५ मध्येच तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रसार...
2 May 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, April 30th, 2016
=विनोद तावडे यांचे स्पष्टीकरण= मुंबई, [२९ एप्रिल] – राज्य सरकारतर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्राची एमएच-सीईटी ही परीक्षा ५ मे २०१६ रोजी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या तारखेमध्ये कोणताही बदल होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केली आहे, त्या विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता पूर्ण तयारीनिशी ही परीक्षा द्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केले. विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षा याच शैक्षणिक...
30 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, April 30th, 2016
हायकोर्टाचे आदेश आव्हानासाठी १२ आठवड्यांची मुदत दोषी अधिकार्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश मुंबई, [२९ एप्रिल] – कारगिल शहीदांच्या परिवारासाठी बांधण्यात आलेली; पण राजकीय नेत्यांमुळे भ्रष्टाचाराचे कुरण ठरलेली आदर्श सोसायटीची ३१ मजली इमारत पाडण्याचा महत्त्वपूर्ण आणि केवळ राज्यातीलच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणात भूकंप आणणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज शुक्रवारी दिला आहे. या सोसायटीतील फ्लॅट राजकीय नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना विकणार्या दोषी प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि तत्कालीन मंत्र्यांविरुद्ध केंद्र व राज्य...
30 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, April 30th, 2016
रत्नागिरी, [२९ एप्रिल] – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना भाजपाने जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जाहीर केले आहे. भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या शिबिरात खुद्द जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी या धोरणाचे सूतोवाच केल्याने युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणुकीत आतापर्यंत दोन्ही पक्षांनी युती करून विरोधकांशी लढा दिला आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढल्यानंतर स्थानिक पातळीवरील वाद वाढले आहेत. त्यातच केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस...
30 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, April 30th, 2016
=अफझल गुरूचा वाद= नवी दिल्ली, [२९ एप्रिल] – दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) परिसरात ९ फेब्रुवारी रोजी संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरूच्या फाशीला विरोध करताना देण्यात आलेल्या राष्ट्रविरोधी घोषणांच्या घटनेचा तपास करण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाने दिल्ली पोलिसांना सादर केला. या घटनेनंतर देशद्रोहाच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास करणार्या दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी विशेष पथकाने विद्यापीठाच्या मुख्य प्रोटेक्टरकडे या अहवालाची मागणी केली होती. विशेष शाखेने अहवालाकरिता...
30 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, April 29th, 2016
मुंबई, [२८ एप्रिल] – पाणीटंचाईची भर पडल्याने यंदाची दुष्काळी परिस्थिती अधिक आव्हानात्मक आहे. मात्र, चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने या परिस्थितीचे संधीत रूपांतर करून शेती क्षेत्रात मोठा बदल घडविणे शक्य आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने शेतकर्यांच्या बरोबरीने ‘मिशन मोड’ वर प्रयत्न करून यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. अधिकाधिक शेतकरी संस्थात्मक कर्जाच्या कक्षेत आणून स्थानिक पातळीवर अंमलबजावणी करणार्या शासकीय यंत्रणेने संवेदनशीलतेने प्रयत्न केल्यास अडचणीतील...
29 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, April 28th, 2016
मुंबई, [२८ एप्रिल] – मागील काही दिवसांपासून सूरू असलेल्या अधिकार्यांच्या बदल्याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात मोठे फेरबदल केले असून ७३ ज्येष्ठ सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री आणि या अधिकार्यांमध्ये अनेक कारणांमुळे खटके उडत होते. सनदी अधिकारी आमचे ऐकत नाही, त्यांना वठणीवर आणा अशी तक्रार अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती. यांच्यातील वाद, विकोपास गेलेले शीतयुद्ध ,...
28 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, April 28th, 2016
=महाराष्ट्र सदन व अन्य प्रकल्पांतील घोटाळा= मुंबई, [२७ एप्रिल] – राजधानी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या नूतनीकरणात आणि अन्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीत झालेल्या घोटाळ्यांप्रकरणी दाखल असलेल्या बेकायदेशीर सावकारी प्रतिबंधक कायद्यातील गुन्ह्यांतर्गत विशेष न्यायालयाने आज बुधवारी राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केला आहे. यामुळे पंकज यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घोटाळ्यांतील आरोपी क्रमांक तीनविरुद्ध (पंकज भुजबळ) आपले न्यायालय अजामीनपात्र अटक...
28 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, April 28th, 2016
=ममतांचा कॉंगे्रसवर हल्ला= श्रीरामपूर, [२७ एप्रिल] – शारदा चिटफंड घोटाळ्यावरून पश्चिम बंगाल विधानसभेत गोंधळ घालणारा कॉंगे्रस पक्ष संपुआ सरकारच्या काळात ‘टू-जी’ घोटाळ्यासह घडलेल्या अन्य घोटाळ्यांवर का बोलत नाही, असा सवाल करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज बुधवारी या पक्षावर जोरदार हल्ला चढविला. कॉंगे्रस पक्ष भ्रष्टाचारावर मोठमोठ्या गप्पा मारत आहे. शारदा घोटाळ्यावरून माझ्या सरकारविरोधात बोलत आहे. पण, संपुआ सरकारच्या काळात घडलेल्या हजारो-लाखो कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबत शब्दही काढत नाही. घोटाळ्यांमध्ये आकंठ बुडालेल्या...
28 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, April 28th, 2016
नवी दिल्ली, [२७ एप्रिल] – इंग्रजांना सळो की पळो करून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे शहीद भगतसिंग यांना दिल्ली विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात चक्क दहशतवादी संबोधण्यात आले. अनावधानाने ही चूक झाली असल्याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाने केला असला, तरी इतिहासकार आणि समाजाच्या सर्वच घटकांनी विद्यापीठाच्या या भोंगळ कारभारावर प्रखर टीका केली आहे. देशावर इंग्रजांचे राज्य असताना भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या सारख्या क्रांतिकारांनी ब्रिटिशांना ठार केले होते. त्यांच्या या...
28 Apr 2016 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, April 28th, 2016
=स्वयंचलित हवामान केंद्राचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन : मुख्यमंत्री= मुंबई, [२७ एप्रिल] – बिगर मोसमी पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि राज्यावर वित्तीय ताण वाढतो. त्यामुळे शेतकर्यांना हवामानाचा अचूक अंदाज दिला तर पिकांचे नुकसान थांबू शकते. त्यासाठी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर अचूक हवामान अंदाज देणारे स्वयंचलित हवामान केंद्र (ऑटोमॅटिक व्हेदर स्टेशन) उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य आपत्ती...
28 Apr 2016 / No Comment /