Posted by वृत्तभारती
Monday, September 4th, 2023
पुणे, (०४ सप्टेंबर) – राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. नव्या सत्रातील शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. यावर्षीपासून शिष्यवृत्तीच्या रकमेतही वाढ करण्यात आल्याचे वृत्त आहे. राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून, ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच हजार तर आठवीच्या विद्यार्थ्यांना साडेसात हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी म्हणून शिक्षण विभागाने अर्ज लवकर भरून...
4 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2023
-विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट, मुंबई, (०३ सप्टेंबर) – राज्यात मान्सून पुन्हा सकि‘य झाला आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेला, तर सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला पावसाने पुनरागमन केले आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत जात आहे. रविवारी उत्तर बंगालच्या उपसागरात वार्याची चक्रिय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणीच पुढील २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता असल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात ४ सप्टेंबरनंतर मुसळधार पाऊस होण्याची...
3 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2023
-राष्ट्रवादी काँग्रेसची नवचेतना महासभा, अमरावती, (०३ सप्टेंबर) – विरोधकांनी ’इंडिया’ नावाने एकजूट दाखवण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी त्यांच्यात मतैक्य नाही. ’एनडीए’कडे नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा चेहरा आहे. मात्र विरोधक कुणा एकाचे नावही घेऊ शकत नाहीत. विरोधकांमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी राहुल गांधी यांचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करावे, ते तसे करूच शकणार नाहीत. देशातील जनता नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते (चझ झअॅरर्षीश्र झरींशश्र)...
3 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2023
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन, – कर्नल सुनील शेओरन यांची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती, लेह, (०३ सप्टेंबर) – लेहमध्ये सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार्या त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभारण्यात येत असून, हा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केले. लेहमधील कारू येथे...
3 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2023
मुंबई, (०३ सप्टेंबर) – मराठा आरक्षणाच्या मुद्यावर झालेल्या हिंसाचारानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, वाहत्या गंगेत हात धुऊ नका, असा इशारा विरोधकांना दिला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जालन्यातली घटना ही खरोखर दुर्दैवी आणि गंभीर आहे. तेथील उपोषणकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. विविध माध्यमांतून आमचा त्यांच्याशी संवाद सुरू होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावे, ही आमची विनंती होती. कारण, सरकार मराठा आरक्षणावर...
3 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2023
बुलढाणा, (०३ सप्टेंबर) – मराठा समाज शांत संयमी प्रामाणिक आहे. जालना येथे घडलेली घटना दुर्दैवी असून काही राजकीय समाजकंटक आंदोलनात दगड फेक करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे. ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते गळा काढण्यासाठी आले होते. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही २०२४ ला युती सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने योग्य बाजू न...
3 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2023
मुंबई, (०२ सप्टेंबर) – जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यासाठी सरकारला जबाबदार धरत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकानी केली आहे. हे गृहविभागाचे अपयश असून, फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. जालना येथे लाठीमार केल्यामुळे महिलांसह अनेक आंदोलन गंभीर जखमी झाले आहेत. गृहमंत्री फडणवीस यांचे...
3 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2023
मुंबई, (०२ सप्टेंबर) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणार्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. या घटनेबाबत मराठा बांधवांसह सर्व महाराष्ट्रवासियांच्या भावना तीव्र आहेत. राज्य शासन देखील या...
3 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, September 1st, 2023
– अभिनेता अभिषेक बच्चन बॅण्ड अॅम्बेसिडर, मुंबई, (०१ सप्टेंबर) – यामुळे राज्यभरातील गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी गोविंदांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी अभिनेता अभिषेक बच्चनला बॅण्ड अॅम्बेसिडर बनवण्यात आल्याने, या स्पर्धेचे आकर्षण अधिकच वाढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य शासन आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘प्रो-गोविंदा २०२३’ या स्पर्धेला शुभेच्छा देत, स्पर्धेत सहभागी झालेल्या गोविंदांशी संवाद...
1 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, August 29th, 2023
जयपूर, (२९ ऑगस्ट) – राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये दहशत माजवण्याच्या कटात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनएनआय) अखेर महाराष्ट्रातून अटक केली आहे. हे दोन्ही दहशतवादी मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी असून ते आयएसआयएस प्रेरीत अलसुफाचे सक्रिय दहशतवादी आहेत. हे दोन्ही आयईडी स्फोटक बनवण्याचा ट्रेंड आहे. यासोबतच तो आपल्या सहकार्यांना आयईडी बनवण्याचे प्रशिक्षण देत असे. त्यासाठी तो महाराष्ट्रात पुण्यात आयईडी बनवण्याचे आणि स्फोट घडवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी दोन शिबिरेही चालवत होता....
29 Aug 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, August 29th, 2023
– आज निघणार जाहिरात : तानाजी सावंत, मुंबई, (२९ ऑगस्ट) – मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास १२ हजार पदांसाठीची जाहिरात मंगळवारी निघणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी दिली. राज्यातील आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया ही अनेक दिवसांपासून रखडली होती. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना या भरती प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले होते, पण काही दिवसांपूर्वी ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारने यात लक्ष घातले...
29 Aug 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, August 28th, 2023
पुणे, (२८ ऑगस्ट) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात बारावीचा निकाल ३२.१३ टक्के तर, दहावीचा निकाल २९.८६ टक्के लागला. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी निकालाची माहिती दिली. राज्य मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेतली होती. बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ७० हजार २०५ विद्यार्थ्यांपैकी ६८ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती....
28 Aug 2023 / No Comment /