Posted by वृत्तभारती
Saturday, April 8th, 2023
– काँग्रेसला ३ दिवसात ३ मोठे धक्के !, नवी दिल्ली, (०८ एप्रिल) – काँग्रेस सध्या अत्यंत वाईट टप्प्यात आहे. पक्षातील विश्वासू नेतेही आता काँग्रेस सोडत आहेत. देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला तीन दिवसांत सलग तिसरा धक्का बसला आहे. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केसवन यांनी शनिवारी (८ एप्रिल) भाजपमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त आहे. केसवन यांनी महिनाभरापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. वृत्तानुसार, काँग्रेस सोडताना केशवन यांनी...
8 Apr 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, April 8th, 2023
– राहुल गांधींना घराचा अहेर, नवी दिल्ली, (०८ एप्रिल) – काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांची यादी मोठी होत चालली आहे. यातील काही नेते भाजपचे मोठे चेहरे बनले आहेत. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा. जे एकेकाळी काँग्रेसचे होते, पण भाजपमध्ये गेले आणि आज मुख्यमंत्री आहेत. या यादीत ज्योतिरादित्य सिंधिया यांचेही नाव आहे, जे आता केंद्रीय मंत्री आहेत. त्याचवेळी आता काँग्रेसच्या काळात संरक्षणमंत्री असलेले ए.के.अँटोनी यांचे पुत्र...
8 Apr 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, April 8th, 2023
-अंबानी-अदानींच्या देशासाठीच्या योगदानाची दाखल घ्यावी, नवी दिल्ली, (०८ एप्रिल) – अदानी मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्याच्या मागणीबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. काँग्रेसकडून संसदेत वारंवार करण्यात येत असलेल्या या मागणीपासून फारकत घेत त्यांनी फारसा उपयोग होणार नसल्याचे सांगितले. पवार म्हणाले, माझ्या पक्षाने अदानी मुद्द्यावर जेपीसीला पाठिंबा दिला आहे, परंतु मला वाटते जेपीसीवर सत्ताधारी पक्षाचे वर्चस्व असेल, त्यामुळे सत्य बाहेर येणार नाही. त्यामुळे मला वाटते की सर्वोच्च न्यायालयाच्या...
8 Apr 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, April 5th, 2023
-खरगे फक्त नावाचेच अध्यक्ष, नवी दिल्ली, (०५ एप्रिल) – काँग्रेस पक्षात निवडणुका होऊन मल्लिकार्जुन खरगे यांची अध्यक्षपदी निवड झाली असली, तरी ते केवळ नाममात्र आहेत; पक्षाचा रिमोट कंट्रोल आजही राहुल गांधी यांच्याच हातात आहे आणि तेच काँग्रेसचा कारभार चालवत आहेत, असा जोरदार हल्लाबोल राज्यसभेचे माजी सदस्य आणि डेमॉक‘ॅटिक आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी बुधवारी चढविला. ‘आझाद- एक आत्मचरित्र’ या आपल्या पुस्तकाच्या विमोचनाच्या अनुषंगाने आझाद यांनी आपल्या माजी सहकार्यांशी...
5 Apr 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, April 3rd, 2023
नवी दिल्ली, (०३ एप्रिल) – आव्हान याचिका दाखल करण्याच्या नावावर सूरतमध्ये शक्तिप्रदर्शन करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रकारावर भाजपाने जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचा हा न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे का, अशी विचारणा भाजपा प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी केली आहे. राहुल गांधी, आपले कुटुंबीय, मुख्यमंत्रीद्वय अशोक गहलोत आणि भूपेश बघेल यांच्यासोबत सू?रतला गेले. दोन वर्षांच्या शिक्षेला आव्हान देण्याच्या नावाखाली देशात अराजक निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचा आरोप पात्रा...
3 Apr 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, April 3rd, 2023
उदलगुरी (आसाम), (०३ एप्रिल) – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भ्याड असून, त्यांची वीरता केवळ दिल्लीच्या विधानसभेपर्यंतच मर्यादित असल्याचा टोला आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी लगावला. गुवाहाटी येथे केलेल्या टिप्पणीबद्दल केजरीवाल यांच्यावर त्यांनी टीका केली. केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत आपल्यावरील केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा कोणताही संदर्भ त्यांच्या भाषणात न दिल्याबद्दल सरमा यांनी टीका केली. त्यांनी दिल्ली विधानसभेत माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. परंतु मी त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही; कारण त्यांना...
3 Apr 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 29th, 2023
नवी दिल्ली, (२९ मार्च) – केंद्र सरकारने राहुल गांधी यांना सरकारी निवासस्थान सोडण्यासंदर्भात नोटीस बजावल्यानंतर आता काँग्रेस पक्षाने देशभरात ‘माझे घर राहुल गांधींचे घर’, अशी मोहीम देशभरात सुरू केली आहे. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा, त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द आणि सरकारी निवासस्थान सोडण्याची कारवाई या तिन्ही गोष्टी काही तासांच्या अंतराने घडून आल्या. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. याशिवाय देशभरात काँग्रेस नेते, समर्थकांनी माझे घर राहुल गांधींचे...
29 Mar 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 29th, 2023
नवी दिल्ली, (२९ मार्च) – मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांचे पूर्वाधिकारी बी. एस. येदीयुरप्पा यांच्या नेतृत्वात संपूर्ण बहुमतासह भाजपा कर्नाटकात सत्तेत परतेल, असा विश्वास भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केल्यानंतर व्यक्त केला. सरकारने राज्यात ऐतिहासिक विकास कामे केली असल्याने भाजपा सलग दुसर्यांना सत्ता मिळवेल, असे संसदीय कामकाज मंत्री आणि कर्नाटकातील धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी...
29 Mar 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 28th, 2023
नवी दिल्ली, (२८ मार्च) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरेल तसेच अभद्र टिप्पणीवर ओबीसी समाजाची माफी मागण्यास दिलेल्या नकाराच्या माध्यमातून गांधी कुटुंबाच्या राजकीय अहंकाराचा आणखी एक पुरावा समोर आला आहे, असा घणाघात भाजपाने मंगळवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा प्रयत्न राहुल गांधी करीत आहेत. मात्र, देशातील नागरिक मोदींच्या पाठीशी असल्याने त्यात त्यांना यश मिळणार नाही, असे भाजपाच्या...
28 Mar 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 28th, 2023
-काँग्रेसला निर्वाणीचा सल्ला, नवी दिल्ली, (२८ मार्च) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने होत असलेली टीका आणि त्यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून घेतला जाणारा आक्षेप या पृष्ठभूमीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला एकत्र ठेवण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मैदानात उतरावे लागले. त्यांनी सावरकर मुद्यावर ठाकरे गटाची चिंता काँगे‘सला विशेषत: राहुल गांधी यांना कळविली असून, सावरकरांवर यापुढे टीका न करण्याचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राहुल गांधी सतत सावरकर...
28 Mar 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 28th, 2023
नवी दिल्ली, (२८ मार्च) – खासदार झाल्यानंतर बंगला रिकामा केल्याबद्दल राहुल गांधी यांनी लोकसभा सचिव डॉ.मोहित रंजन यांना उत्तर दिलं आहे. तुम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करेन, असे काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी म्हंटले म्हणाले. राहुल गांधींनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ’१२ तुघलक लेन येथील माझ्या घराचे वाटप रद्द करण्याबाबतच्या पत्राबद्दल धन्यवाद. लोकसभेचा निवडून आलेला सदस्य म्हणून मी ४ वेळा निवडून आलो आणि इथेच राहिलो. माझ्या चांगल्या आठवणीही इथे जोडल्या...
28 Mar 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 28th, 2023
नवी दिल्ली, (२८ मार्च) – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरून केलेल्या अपमानजनक विधानामुळे देशातील समस्त ओबीसी समाजाचा अपमान झाला, असा आरोप करीत भाजपाच्या ओबीसी खासदारांनी मंगळवारी संसदभवनातून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी, अशी मागणी या मोर्चात सहभागी भाजपा खासदार करत होते. सर्व चोर मोदी आडनावाचेच कसे असतात, असे विधान राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान केले होते. या विधानामुळे...
28 Mar 2023 / No Comment /