Posted by वृत्तभारती
Tuesday, September 5th, 2023
मंडला, (०५ सप्टेंबर) – अल्पसंख्यकांच्या तुष्टीकरणाचे धोरण काँग्रेस राबवत आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने मात्र आदिवासी, दलित, गरीब आणि मागासवर्गीयांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे, असे शाह यांनी सांगितले. मध्यप्रदेशात नोव्हेंबरमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीत भाजपा १५० पेक्षा जास्त जागांवर विजयी होईल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. महाकौशल प्रदेशातील मंडला येथे भाजपाच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या जनसंपर्क कार्यक्रमाला हिरवा...
5 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, September 5th, 2023
नवी दिल्ली, (०५ सप्टेंबर) – आठ राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. द एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालातून ही माहिती समोर आली. राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत एका वर्षात १ हजार ५३१ कोटींनी वाढ झाली. २०२०-२१ मध्ये ७ हजार २९७ कोटी असलेली राष्ट्रीय पक्षांची संपत्ती २०२१ -२२ मध्ये ८ हजार ८२९ कोटींवर गेली आहे. अहवालानुसार, भाजपाच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली. एकट्या भाजपाच्या संपत्तीत एका वर्षात १०५६ कोटींची वाढ झाली....
5 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 4th, 2023
-भेदभाव, असमानतेला प्रोत्साहन मिळत असल्याची टीका, चेन्नई, (०४ सप्टेंबर) – तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या वक्तव्याचे प्रियांक खरगे यांनी समर्थन केले आहे. सनातन धर्म भेदभाव, असमानतेला प्रोत्साहन देणारा असल्याची टीका स्टॅलिन यांनी केली होती. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला संपुष्टात आणण्याची गरज असल्याचे म्हटले होते. यानंतर देशभरातून त्यांच्या वक्तव्याला विरोध होत आहे. अशातच कर्नाटक सरकारमधील मंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे पुत्र प्रियांक यांनी उदयनिधी...
4 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 4th, 2023
जैसलमेर, (०४ सप्टेंबर) – राजस्थानच्या जैसलमेरमध्ये सोमवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले की चांद्रयान-३ चंद्रावर उतरले आहे, परंतु राहुलयान अद्याप उतरले नाही किंवा प्रक्षेपित केले गेले नाही. ’परिवर्तन संकल्प यात्रे’ला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आहे. हे आजपर्यंत कोणत्याही देशाला करता आलेले नाही. ते म्हणाले की, भारत चंद्रावर पोहोचला आहे....
4 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 3rd, 2023
– राहुल गांधी यांचा आरोप, नवी दिल्ली, (०३ सप्टेंबर) – केंद्र सरकारची ‘एक देश, एक निवडणूक’ ही संकल्पना भारतीय संघराज्य आणि त्याच्या सर्व राज्यांवर हल्ला आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी एका ‘एक्स’ पोस्टवर केला. देशात लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या शक्यतेवर केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यानंतर राहुल गांधींनी हा आरोप केला आहे. काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी...
3 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, September 1st, 2023
मुंबई, (०१ सप्टेंबर) – महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आय.एन.डी.आय.ए. (इंडियन न्याशनल डेव्हलपमेंट इनक्लूझीव अलायन्स) ची बैठक होत आहे. या बैठकीला राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीने खळबळ उडाली आहे. यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली. भारताच्या तिसर्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. यादरम्यान सपाच्या तिकिटावर राज्यसभेवर पोहोचलेले माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बलही अचानक आले. यावर काँग्रेसचे अनेक नेते अस्वस्थ झाले. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपालही यावरून चांगलेच संतापले. ग्रुप फोटो क्लिक...
1 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, September 1st, 2023
-अगदी वेळ पाहून भाजपाने फेकले जाळे, नवी दिल्ली, (०१ सप्टेंबर) – केंद्र सरकारने गुरुवारी ‘एक देश एक निवडणूक’ योजनेच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक प्रक्रिया करण्यासंबंधी घोषणा करताच हा एकप्रकारे भारतीय जनता पार्टीने देशातील विरोधी पक्षांवर केलेला सर्जिकल स्ट्राईक असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजकीय जाणकारांनुसार, भारतीय जनता पार्टीने आगामी लोकसभा आणि काही राज्यांची विधानसभा निवडणूक पाहता विरोधकांवर अगदी वेळ पाहून फेकलेले जाळे आहे. भाजपाचा हा डाव ओळखण्यात आला असला तरी सत्ताधारी वा...
1 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, August 27th, 2023
-बिहार, मध्यप्रदेशात स्वबळावर लढणार, नवी दिल्ली, (२७ ऑगस्ट) – ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईत होणार्या बैठकीसाठी जोरदार तयारी केली जात असतानाच या आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे आम आदमी पार्टी अर्थात् आपने बिहारमधील निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली तर, दुसरीकडे समाजवादी पार्टी म्हणजे सपाने मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा करून आघाडीला दणका दिला. आपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री संदीप पाठक यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. आप बिहारमध्ये निवडणूक...
27 Aug 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, August 27th, 2023
म्हणाले, आपण चंद्राचे मालक आहोत का?, नवी दिल्ली, (२७ ऑगस्ट) – भारताच्या चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध‘ुवावर लॅण्डिंग केले आणि जगभरातील समस्त भारतीयांनी आनंद साजरा केला. ज्यांना काही कळत नव्हते, त्यांनीही जल्लोष केला. मात्र, काँग‘ेस नेते रशीद अल्वी यांनी लॅण्डिंग पॉईंटला ‘शिवशक्ती’ हे नाव देण्यावरून थयथयाट केला आहे. ग‘ीस दौर्यावरून परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी बंगळुरूमध्ये इस्रोच्या वैज्ञानिकांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शास्त्रज्ञांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी...
27 Aug 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, August 25th, 2023
– मणिशंकर अय्यर यांचा आरोप, नवी दिल्ली, (२४ ऑगस्ट) – भारताचे दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव हे जातीयवादी होते. एवढेच नाही, तर भाजपाचे ते पहिले पंतप्रधान होते, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी केला. मणिशंकर अय्यर यांनी ‘मेमोयर्स ऑफ ए मेवरिक-द फर्स्ट फिफ्टी इयर्स’ या नावाने आत्मचरित्र लिहिले असून या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी...
25 Aug 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, August 22nd, 2023
-मुसलमानांनी बांगड्या घातल्या नाहीत, भोपाळ, (२२ ऑगस्ट) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अजीज कुरेशी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. वादग्रस्त विधानांचा वर्षाव करणारे कुरेशी यांनी काँग्रेसने आपल्याला पक्षामधून काढायचेच असेल तर काढून टाकावे, असे म्हणत मुसलमानांवर वादग्रस्त वक्तव्य केले. ’’२२ कोटी मुस्लिमांनी बांगड्या घातलेल्या नाहीत, त्यापैकी १-२ कोटी मेले तरी फरक पडत नाही,’’ असे म्हणून कुरेशी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. मध्य प्रदेशातील...
22 Aug 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, August 21st, 2023
– सगळीकडे संघाची माणसे पेरल्याचा दावा, नवी दिल्ली, (२१ ऑगस्ट) – उजव्या विचारसरणीची संघटना देशातील प्रत्येक संस्थेत आपली माणसं पेरत आहे, असा आरोप करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला चढवला. कॅबिनेट मंत्री निर्णय घेत नाहीत, तर मंत्रालयात काय असायला हवे, हे ठरवणारे रा. स्व. संघाचे एक गृहस्थ आहेत, असा दावा त्यांनी लडाखमधील एका कथित सार्वजनिक संवादाच्या व्हिडीओ क्लिपमध्ये केला. रा. स्व. संघ ही भाजपा वैचारिक शाखा...
21 Aug 2023 / No Comment /