किमान तापमान : 28.4° C
कमाल तापमान : 29.21° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 69 %
वायू वेग : 4.3 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.4° C
27.99°C - 31.28°C
scattered clouds28.16°C - 30.79°C
scattered clouds27.96°C - 30.78°C
sky is clear28.32°C - 31.81°C
few clouds28.98°C - 33.15°C
sky is clear28.99°C - 32.97°C
few cloudsपुणे, [२० फेब्रुवारी] – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा शनिवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यंदा संपूर्ण राज्यातून १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
परीक्षेच्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या परीक्षेला १ लाख ३८ हजार विद्यार्थी संख्या जास्त आहे. तसेच यंदा विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारावीची परीक्षा शनिवारपासून येत्या २६ मार्चपर्यंत होणार आहे. नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७ लाख ५७ हजार १३६ विद्यार्थी व ५ लाख ८२ हजार ६६ विद्यार्थिनी आहेत. एकूण ७ हजार ९५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, या परीक्षेसाठी राज्यात २ हजार ३८९ परीक्षा केंद्रे आहेत.