किमान तापमान : 28.54° C
कमाल तापमान : 29.51° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 72 %
वायू वेग : 4.34 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.51° C
28.31°C - 30.52°C
broken clouds27.79°C - 31.42°C
light rain27.78°C - 30.14°C
sky is clear27.22°C - 30.08°C
sky is clear27.13°C - 29.97°C
sky is clear26.87°C - 29.96°C
sky is clearअंजनी (तासगाव), [१७ फेब्रुवारी] – महाराष्ट्राचे लोकनेते, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते आर. आर. पाटील ऊर्फ आबा यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी सांगली जिल्ह्यातील त्यांच्या अंजनी या जन्मगावी संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘आर. आर. पाटील अमर रहे’ अशा घोषणा देऊन हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रूनयनांनी निरोप दिला.
मुलगा रोहित, कन्या स्मिता आणि सुप्रिया यांनी आबांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. दुपारी दोनच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॉंगे्रसचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, भाजपा नेते विनोद तावडे, एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, संजयकाका पाटील, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, दिवाकर रावते, शेकाप नेते गणपतराव देशमुख, कॉंग्रेस नेते माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, नारायण राणे, मधुकर चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, विनायक मेटे, रामदास आठवले, राजू शेट्टी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, माजी मंत्री आणि विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह समाजाच्या सर्वच स्तरावरील हजारो नागरिक आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. आबांना अलविदा करताना अंजनीवासीयांंना हुंदके अनावर झाले होते. भावनाविवश झालेल्या नागरिकांनी ‘आर. आर. पाटील अमर रहे’, ‘परत या… परत या’ अशा घोषणा दिल्या.
गेल्या तीन महिन्यांपासून मुखाच्या कर्करोगाने ग्रासलेले आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात निधन झाले होते. मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी म्हणजेच अंजनी येथील निवासस्थानी आणण्यात आले. यानंतर कृषी उत्पादन विपणन समितीच्या कार्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. तिथेही शेकडो पुरुष व महिलांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. चौक एरियातून आबांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली. हेलिपॅड ग्राऊंड येथे आल्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांनी आबांच्या पार्थिवाला खांदा दिला. आबा गृहमंत्री असताना त्यांना येणे-जाणे सोपे व्हावे, म्हणून हे हेलिपॅड गावात उभारण्यात आले होते. आज त्याच हेलिपॅडजवळ त्यांच्या पाथिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सरकारने आज मंगळवारी आबांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता.
सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अंजनी या लहानशा गावात एका सामान्य कुटुंबात आबांचा जन्म झाला होता. त्यांच्यातील नेतृत्व कौशल्य हेरून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आबांना राजकारणाचे बाळकडू दिले. जिल्हा परिषद ते विधानसभा सदस्य हा प्रवास आबांनी अल्पावधीत पूर्ण केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा वारसा नसलेल्या आबांनी महाराष्ट्र विधानसभा तब्बल २५ वर्षे गाजवली.