|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:07 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.4° C

कमाल तापमान : 33.46° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 50 %

वायू वेग : 8.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

33.46° C

Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.79°C - 34.99°C

light rain
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.78°C - 30.14°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.22°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

27.13°C - 29.97°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

26.87°C - 29.96°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.22°C - 30.15°C

sky is clear
Home » आसाम-ईशान्य भारत, ठळक बातम्या, राज्य » आसामातील घुसखोरी थांबवणार : राजनाथ

आसामातील घुसखोरी थांबवणार : राजनाथ

rajnathSinghदुलिआजन (आसाम), [३० मार्च] – बांगलादेशातून आसामात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकार भारत-बांगलादेश सीमा पूर्णपणे बंद करणार आहे. याआधीचे कॉंग्रेस सरकार ही घुसखोरी थांबवण्यासाठी पूर्णत: असमर्थ ठरले होते, असे म्हणत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी कॉंग्रेसवर निशाणा साधला. एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
बांगलादेशच्या निर्मितीपासूनच तेथून भारतात सातत्याने घुसखोरी होत आहे. भारत-बांगलादेश सीमेवरूनच बांगलादेशी घुसखोर भारतात शिरतात. मात्र, कॉंग्रेसने याआधी त्याकडे कधीच लक्ष का दिले नाही. कॉंग्रेसने ही सीमा यापूर्वीच पूर्णत: बंद (सील) का केली नाही, असे सवालही गृहमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केले.
याप्रकरणी आपल्या पक्षाने उचललेली ठोस पावले वर्णन करताना ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच आम्ही भारत-बांगलादेश सीमेला भेट देऊन याबाबत बांगलादेश सरकारशी बोलणी सुरू केली आहे. आम्हाला आता केवळ थोडाच अवधी हवा आहे आणि लवकरच आम्ही ही सीमा पूर्णत: बंद करून टाकू, जेणेकरून येथून घुसखोर आत शिरू शकणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
४ आणि ११ एप्रिल अशा दोन टप्प्यात होणार्‍या आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी गृहमंत्री राजनाथ सिंह भाजपकडून आणखी तीन निवडणूक प्रचारसभांना संबोधणार आहेत. त्याचबरोबर दिल्लीत परतण्यापूर्वी गुरुवारी पश्‍चिम बंगालमध्येही ते दोन प्रचारसभांमध्ये भाषण देतील.

Posted by : | on : 31 Mar 2016
Filed under : आसाम-ईशान्य भारत, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g