किमान तापमान : 30.4° C
कमाल तापमान : 33.46° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 8.46 Mps
स्थळ : Mumbai, IN
33.46° C
27.79°C - 34.99°C
light rain27.78°C - 30.14°C
sky is clear27.22°C - 30.08°C
sky is clear27.13°C - 29.97°C
sky is clear26.87°C - 29.96°C
sky is clear27.22°C - 30.15°C
sky is clearदुलिआजन (आसाम), [३० मार्च] – बांगलादेशातून आसामात होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी केंद्रातील रालोआ सरकार भारत-बांगलादेश सीमा पूर्णपणे बंद करणार आहे. याआधीचे कॉंग्रेस सरकार ही घुसखोरी थांबवण्यासाठी पूर्णत: असमर्थ ठरले होते, असे म्हणत गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी कॉंग्रेसवर निशाणा साधला. एका निवडणूक प्रचारसभेत ते बोलत होते.
बांगलादेशच्या निर्मितीपासूनच तेथून भारतात सातत्याने घुसखोरी होत आहे. भारत-बांगलादेश सीमेवरूनच बांगलादेशी घुसखोर भारतात शिरतात. मात्र, कॉंग्रेसने याआधी त्याकडे कधीच लक्ष का दिले नाही. कॉंग्रेसने ही सीमा यापूर्वीच पूर्णत: बंद (सील) का केली नाही, असे सवालही गृहमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केले.
याप्रकरणी आपल्या पक्षाने उचललेली ठोस पावले वर्णन करताना ते म्हणाले की, काही महिन्यांपूर्वीच आम्ही भारत-बांगलादेश सीमेला भेट देऊन याबाबत बांगलादेश सरकारशी बोलणी सुरू केली आहे. आम्हाला आता केवळ थोडाच अवधी हवा आहे आणि लवकरच आम्ही ही सीमा पूर्णत: बंद करून टाकू, जेणेकरून येथून घुसखोर आत शिरू शकणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
४ आणि ११ एप्रिल अशा दोन टप्प्यात होणार्या आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी गृहमंत्री राजनाथ सिंह भाजपकडून आणखी तीन निवडणूक प्रचारसभांना संबोधणार आहेत. त्याचबरोबर दिल्लीत परतण्यापूर्वी गुरुवारी पश्चिम बंगालमध्येही ते दोन प्रचारसभांमध्ये भाषण देतील.