|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.44° C

कमाल तापमान : 30.81° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 66 %

वायू वेग : 6.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.81° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 30.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.36°C - 29.62°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.21°C - 28.95°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.5°C - 28.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.47°C - 29.11°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.63°C - 28.83°C

scattered clouds
Home » ठळक बातम्या » एटीएम वापरण्याचे पैसे पडणार?

एटीएम वापरण्याचे पैसे पडणार?

=बँका घेणार शुल्काच्या नक्की आकड्याचा निर्णय=
atm1नवी दिल्ली, (३ जानेवारी) – बँकेत जाऊन, रांगेत लागून पैसे काढण्याची पद्धत आपण एटीएम मशिन्समुळे पार विसरूनच गेलो आहोत. पण, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आगामी निर्णयामुळे पुन्हा एकदा आपल्यावर बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लावण्याचीच वेळ येणार आहे. एटीएममधून पैसे काढणार्‍या ग्राहकांकडून निश्‍चित शुल्क वसूल करण्याचे अधिकार बँकांना देण्याचा विषय आरबीआयच्या विचाराधीन आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गवर्नर के.सी. चक्रवर्ती यांनी एटीएम सेवेसाठी बँका शुल्क वसूल करणार असतील,तर आरबीआयला आक्षेप राहणार नाही, असे विधान केले आहे. सध्या असा प्रस्ताव आपल्यापुढे आला नसला तरी असे शुल्क आकारण्यास बँकांना परवानगी देता येणार आहे. ‘सध्या विविध बँकांचे एटीएम वापरात असून बँकांमध्ये असलेल्या स्पर्धेनुसार त्यांनी ही कर आकारणी करावी. याबाबतीत हाच निर्णय आदर्श ठरणार आहे,’असे मत त्यांनी मांडले.
बंगळुरूमध्ये गेल्या वर्षी एका महिलेवर एटीएम केंद्रात पैसे काढताना झालेल्या भीषण हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर, बँकांनी एटीएम केंद्रांच्या चोवीस तास सुरक्षेची व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, हे सगळे फारच खर्चिक असल्याने बँका त्यासाठी तयार नाहीत. काही बँकाचे पदाधिकारी या प्रस्तावावर विचार करीत असून सुरक्षेच्या उपाययोजनेसाठी एटीएमचा वापर करणार्‍यांकडूनच रक्कम वसूलण्यात येणार असल्याचे चित्र दिसत आहे. शिवाय, काही बँकांच्या मते ठराविक काळातच सुरक्षा देण्यात यावी.याविषयी देशातील बँकांची सर्वोच्च संघटना आयबीएसोबत चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.
जादा शुल्क भरून एटीएमचा वापर करायचा किंवा बँकेत रांग लावण्याची जुनी पद्धत अवलंबायची आहे,हे आता ग्राहकावर अवलंबून आहे.

Posted by : | on : 4 Jan 2014
Filed under : ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g