किमान तापमान : 29.45° C
कमाल तापमान : 30.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.31 Mps
स्थळ : Mumbai, IN
30.99° C
28.09°C - 31.04°C
sky is clear27.84°C - 30.5°C
few clouds27.88°C - 30.57°C
scattered clouds27.07°C - 30.5°C
sky is clear28.09°C - 31.79°C
sky is clear29.08°C - 32.94°C
sky is clear=योगेंद्र यादव यांनी डागली तोफ=
वाराणसी, [६ जून] – राजधानी दिल्लीत नायब राज्यपाल नजीब जंग आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यात सध्या सुरू असलेला संघर्ष म्हणजे केवळ अहंकाराचा वाद असून, केजरीवाल यांचे एकूणच वागणे बालिशपणाचे आहे, अशा शब्दात आम आदमी पार्टीचे बडतर्फ नेते योगेंद्र यादव यांनी आज शनिवारी केजरीवालांवर तोफ डागली.
आपमधून बाहेर पडल्यानंतर यादव यांनी स्वराज अभियान नावाची राजकीय चळवळ स्थापन केली आहे. आमची चळवळ राजकारणाशी संबंधित असली, तरी आम्ही कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, असे यादव यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश असल्याने अन्य राज्यांप्रमाणे येथे लोकनियुक्त सरकारला सर्वच अधिकार मिळत नसतात, याची जाणीव असतानाही केजरीवाल यांनी अधिकारांच्या मुद्यावरून नायब राज्यपालांशी संघर्षाची भूमिका घेतली. त्यांचे आजवरचे वागणे पोरकटपणाचेच राहिले आहे. त्यांना राजकारणाचा अनुभव नसल्याने कदाचित ते वागत असावे, असा चिमटाही त्यांनी काढला.
केजरीवाल आणि त्यांच्या अवतीभोवती फिरणार्या लोकांकडून फसवणूक झालेल्या लोकांना आम्ही जवळ करणार आहोत. आम्ही निवडणूक लढणार नाही. पण, नजीकच्या काळात ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तिथे आम्ही आमच्या सभा आयोजित करणार, असेही यादव म्हणाले.