किमान तापमान : 27.69° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 74 %
वायू वेग : 3.78 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
26.5°C - 30.21°C
broken clouds26.61°C - 28.63°C
few clouds26.51°C - 27.96°C
few clouds25.7°C - 27.91°C
sky is clear25.73°C - 27.99°C
sky is clear25.99°C - 28.4°C
scattered clouds=हवामान खात्याचा इशारा=
नवी दिल्ली, [२० एप्रिल] – दोन आठवड्यांपूर्वी देशाच्या विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातल्यानंतर देशभरातच उन्हाचा कहर सुरू झाला असून, आगामी काळात तापमानात प्रचंड वाढ होण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागात सातत्याने तापमानात वाढ होत आहे. एप्रिलच्या अखेरपर्यंत काही ठिकाणी तापमान ४४ ते ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रविवारी पारा चाळीशीच्या वर पोहोचला होता. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पारा ४० अंशांवर पोहोचला होता. उत्तर भारतातील अनेक शहरांमध्येही पारा सातत्याने वाढत आहे. एप्रिलपेक्षाही मे महिना जड जाणार आहे. या उन्हाळ्यात तापमान नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यताही नाकारता येणार नाही, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.