किमान तापमान : 28.61° C
कमाल तापमान : 29.53° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 67 %
वायू वेग : 4.39 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.53° C
27.81°C - 31.08°C
sky is clear27.9°C - 31.07°C
sky is clear28.34°C - 31.49°C
sky is clear28.53°C - 32.83°C
sky is clear29.1°C - 32.6°C
few clouds28.64°C - 31.99°C
sky is clear=विखे पाटील यांचा घणाघाती प्रहार=
शिर्डी, [७ सप्टेंबर] – राज्यातील दुष्काळाला बारामतीकर हेच जबाबदार असून त्यांच्यामुळेच राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रगतीचा खेळखंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद, केंद्रात कृषीखाते, राज्यात सिंचन आणि पाटबंधारे अशी महत्त्वाची खाती असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही? मराठवाड्यात कायमचा दुष्काळ कसा राहील याचं नियोजन बारामतीकरांनी मोठ्या खुबीनं केलं, असा घणाघाती प्रहार कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता केला आहे.
बारामतीच्या भागातील ऊसाला पाणी कमी पडू नये यासाठी बाराशे कोटी रुपयांचा भिमा स्थिरीकरण प्रकल्प हाती घेतला. तो पैसा गोदावरी खोर्यासाठी वापरला असता तर मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटला असता, याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
बारामतीकर भांडणं लावून देण्यात पटाईत. पाण्यावर, दुष्काळावर राजकारण करू नका म्हणणार्या बारामतीकरांनीच पाणी आणि दुष्काळाचे राजकारण केले, अशी टीका विखे पाटलांनी केली. बारामतीकरांच्या पक्षात न्याय देण्याचं धोरणच नाही. टगेगिरीचं राजकारण करणार्यांनी मराठवाड्याचा पाणी प्रश्न का सोडवला नाही? राज्याचा खेळखंडोबा करणारे हेच लोक आता आंदोलनाची भाषा बोलत आहेत. टगेगिरी करणार्यांवर मोर्चे काढण्याची वेळ का आली? या शब्दात अजित पवारांवरही विखे पाटलांनी टीकास्त्र सोडलं.
महाराष्ट्रातील हा दुष्काळ भयावह आहे. सरकारनंच फक्तदिलासा देण्याची नव्हे, तर सगळ्यांनी मदत करण्याची गरज असताना काही लोक घाबरवून सोडतायेत. म्हणतात, कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते. शरद पवार हेच पाणी प्रश्नाला जबाबदार आहेत. राजकारण करून स्वत:ची पोळी भाजण्यात त्यांचा हातखंडा आहे, अशी सडकून टीकाही विखे पाटलांनी केली.