किमान तापमान : 31° C
कमाल तापमान : 32.33° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.28 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.33° C
27.8°C - 32.99°C
light rain27.78°C - 30.14°C
sky is clear27.22°C - 30.08°C
sky is clear27.13°C - 29.97°C
sky is clear26.87°C - 29.96°C
sky is clear27.22°C - 30.15°C
sky is clear=राज्यपालांची वटहुकुमावर स्वाक्षरी • ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद=
मुंबई, [२८ एप्रिल] – सर्वसामान्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावी आणि शासन गतिमान करण्यासाठी सेवा हमी कायदा करण्याचा मानस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. सरकारदरबारी असणारे काम विहित वेळेत करणे बंधनकारक करणार्या या सेवा हमी विधेयकाच्या वटहुकुमावर मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली.
सेवा हमी कायदा राज्यात लागू झाला असून, आता विहित वेळेत सेवा उपलब्ध करून न देणार्या अधिकार्यांवर कारवाईची तसेच दंडाची तरतूद देखील यात आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात विधेयकाचा मसुदा मांडण्यात आला होता. मात्र, पुरेसा अवधी न मिळाल्याने त्यावर चर्चा होऊ शकली नव्हती. त्यामुळे याबाबतचा वटहुकूम काढण्यात आला असून, राज्यपालांनी या अध्यादेशावर मंगळवारी स्वाक्षरी केली. आता राज्यात आजपासून सेवा हमी कायदा लागू झाला आहे.
या विधेयकात विविध १६० सेवांचा समावेश आहे. एखाद्या व्यक्तीस जर विहित वेळेत सेवा मिळाली नाही तर ती व्यक्ती त्या विरोधात दाद मागू शकेल. यात जर अधिकारी दोषी आढळला तर त्याला दंडाची तरतूद या कायद्यात आहे. दोषी अधिकार्याला ५०० ते पाच हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद या विधेयकात आहे. राज्यातील लोकांना सेवेची हमी देणारे हे विधेयक गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळातही या विधेयकावर कोणताच निर्णय घेण्यात आलेला नव्हता. भाजपाने गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत हा कायदा लागू करण्याची हमी दिली होती. त्यानुसारच हा निर्णय घेण्यात आलेला आहे.