|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.44° C

कमाल तापमान : 30.14° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 4.59 Mps

स्थळ : Mumbai, IN

30.14° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 30.99°C

broken clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.4°C - 29.57°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.26°C - 28.74°C

few clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.44°C - 28.53°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.35°C - 28.88°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.62°C - 29.09°C

scattered clouds
Home » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला

राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला

=राज ठाकरेंचा हल्लाबोल=
raj-thackeray1नाशिक, [१२ ऑक्टोबर] – बलात्कार करायचाच होता तर निवडणुकीनंतर करायचा’ या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे उमेदवाराबाबत केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला असून, ‘छाती नाही, उंची नाही तरी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री, या शब्दात आबांची खिल्ली उडविली.
महाराष्ट्रातील माता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री. सत्तेचा माज आलेल्या या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का? असा सवाल करतानाच या निवडणुकीत राष्ट्रवादीला गाडावेच लागेल’ असे राज ठाकरे यांनी मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना केले. मनसेचे तासगाव-कवठे महांकाळचे मनसे उमेदवार सुधाकर खाडे यांची राज ठाकरेंनी यावेळी पाठराखण केली.
‘आमचे उमेदवार सुधाकर खाडे यांच्यावर याच आर.आर. पाटलांनी बलात्काराचा गुन्हा टाकला, प्रचाराला बाहेर पडू नये म्हणून सुधाकर खाडे यांच्या पत्नीवर ऍट्रॉसिटीची केस टाकली, हे कशासाठी? तर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भीती वाटते म्हणून, असे राज यावेळी म्हणाले. ‘माझ्या हाती सत्ता दिल्यानंतर पाच वर्षांनीच मला विचारा, काय केलं?’ असे म्हणत राज्यकर्त्यांना जाब विचारण्याचा नागरिकांचा हक्कही त्यांनी उडवून लावला. ‘नाशिककरांना जो शब्द दिलाय् तो पाळल्याशिवाय राहणार नाही. नाशिकला सात महिने झाले आयुक्तच नाहीत. राज्याची वाट लावणार्‍यांना का विचारत नाही? हे सगळे ठरवून चालले आहे. पण, लाचार व्हायची वेळ आली तर लाथ मारीन सत्तेवर,’ अशी स्पष्ट भूमिकाही राज ठाकरेंनी यावेळी मांडली.
आपल्याला नाशिकची ओळख ‘बागांचे शहर’ म्हणून उभी करायची आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.

Posted by : | on : 13 Oct 2014
Filed under : उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g