किमान तापमान : 28.21° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 79 %
वायू वेग : 4.87 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.2°C - 31.17°C
scattered clouds27.97°C - 30.61°C
broken clouds27.62°C - 30.53°C
sky is clear28.16°C - 31.59°C
few clouds29.01°C - 32.88°C
sky is clear28.86°C - 32.65°C
sky is clearझाबुआ, [१२ सप्टेंबर] – मध्यप्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यातील पेटलावाड शहरात अतिशय वर्दळीच्या एका हॉटेलात लपवून ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा आज शनिवारी सकाळी भीषण स्फोट होऊन हॉटेलचा अक्षरश: ढिगारा झाला. यात ८९ जणांचा मृत्यू झाला असून, शंभरावर लोक जखमी झाले आहेत. सरकारने या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या निकटवर्तीयांना प्रत्येकी दोन लाखांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
प्रारंभीच्या वृत्तात गॅस सिलेंडरमुळे हा स्फोट झाला, असे म्हटले होते. पण, या हॉटेलच्या इमारतीत विहिरींच्या खोदकामासाठी वापरात येणार्या स्फोटकांचा साठा करण्यात आला होता. यात मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्यांचाही समावेश होता. स्फोट इतका शक्तिशाली होता की, हॉटेलच्या तीन मजली इमारतीसह आसपासच्या अन्य दोन इमारतींचाही ढिगारा झाला असून, परिसरातील अनेक इमारतींना तडे गेले आहेत. इमारतींच्या ढिगार्याखालून आतापर्यंत ८९ लोकांचे मृतदेह आणि शंभरावर जखमींना बाहेर काढण्यात आले आहे. ढिगारा उपसण्याचे काम अजूनही सुरूच असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे मदत व बचाव कार्यात सहभागी असलेल्या एका अधिकार्याने सांगितले. जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत असून, अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, अशी माहिती विभागीय अधिकारी उर्मिला चोयाल यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
शहरातील बसस्थानकाजवळच साथिया नावाचे हॉटेल आहे. ज्या इमारतीत ही स्फोटके साठविण्यात आली होती, त्या इमारतीच्या मालकाचे नाव राजेंद्र कासवा असून, त्यांच्याजवळ खडकाळ भागात विहिरींच्या खोदकामासाठी स्फोटकांचा साठा करण्याचा परवाना आहे. स्फोट झाला त्यावेळी हॉटेलमध्ये दोनशेपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. स्फोटाच्या परिणामाने आसपासच्या अनेक इमारतींना तडे गेल्याने प्रशासनाने त्या तातडीने रिकाम्या केल्या आहेत. स्फोटांची तीव्रता इतकी भीषण होती की, या परिसरात पार्किंगमध्ये असलेली अनेक वाहने हवेत उडाली आणि नंतर जमिनीवर आदळली. ठार झालेल्यांमध्ये बहुतांश मजुरांचाच समावेश आहे. रोजचे काम मिळविण्यासाठी ते या हॉटेलच्या बाहेर उभे होते. याशिवाय, गुजरातकडे जाण्याकरिता बसची प्रतीक्षा करीत असलेल्या लोकांचाही या दुर्घटनेत बळी गेला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचे गृहमंत्री बाबुलाल गौड यांनी ही माहिती दिली. जखमींवर नि:शुल्क उपचार करण्यात येणार असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मदतीत वाढ करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानांना दु:ख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. मृतांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना योग्य ते उपचार तातडीने मिळावे, यासाठी मी आवश्यक ती सूचना राज्य सरकारला केली आहे, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.