किमान तापमान : 28.51° C
कमाल तापमान : 28.83° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 76 %
वायू वेग : 4 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.83° C
28.7°C - 32.02°C
sky is clear28.87°C - 32.93°C
sky is clear29°C - 32.52°C
few clouds28.78°C - 32.42°C
sky is clear27.84°C - 30.17°C
sky is clear27.21°C - 29.62°C
sky is clear– सूर्ययान निर्धारित कक्षेत प्रस्थापित,
-१२५ दिवसांचा प्रवास,
श्रीहरीकोटा, (०२ सप्टेंबर) – चांद्रयान-३ च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने शनिवारी आणखी एक इतिहास रचला. इस्रोने सूर्याचा अभ्यास करणार्या आदित्य एल-१चे सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सतीश धवन केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केले. येथील दुसर्या लाँच पॅडवरून पीएसएलव्ही-सी ५७ हे रॉकेट आदित्य एल-१ला घेऊन सूर्याच्या दिशेने झेपावले. भारताची ही पहिलीच सौरमोहीम आहे. पीएसएलव्ही-सी ५७ ने उपग्रह अचूकपणे त्याच्या निर्धारित कक्षेत प्रस्थापित केला. भारताच्या पहिल्या सौर वेधशाळेने सूर्य-पृथ्वी एल-१ बिंदूच्या लक्ष्यित स्थानाकडे आपला प्रवास सुरू केला आहे, असे इस्रोने म्हटले आहे.
सूर्याचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी आदित्य-एल १ ने सात वेगवेगळे पेलोड वाहून नेले. प्रक्षेपणानंतर आदित्य अंतराळयानाला कव्हर करणारे पेलोड पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडताना वेगळे झाले. त्यानंतर पीएसएलव्हीचे वेगळे होण्याचे टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. प्रक्षेपणानंतर सुमारे चार महिने हा उपग्रह अंतराळात प्रवास करेल. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये असणार्या एका लॅग्रेंज पॉईंटवर तो ठेवण्यात येईल. हा पॉईंट पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर दूर आहे. हे अंतर चंद्राच्या तुलनेत चार पटींनी अधिक आहे.
पाच वर्षांची मोहीम
या मोहिमेत सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल माहिती मिळेल. आदित्य एल-१चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. चांद्रयान-३प्रमाणेच आदित्य एल-१ सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून एल-१ पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्या मारताना आदित्य एल-१ सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल.
सूर्याचा असा होणार अभ्यास
सूर्याच्या अभ्यासासाठी लॅग्रेंज पॉईंट-१ हा अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, या पॉईंटवरील कोणतीही वस्तू सूर्य-पृथ्वीच्या अनुषंगाने स्थिर राहाते. सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणातील परस्पर संबंधातून ही स्थिरता येते. त्यामुळे वेगवेगळ्या शास्त्रीय संशोधनासाठी हा पॉईंट महत्त्वाचा मानला जातो. सोलर अॅण्ड हेलिस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी याच ठिकाणी आहे. येथून सूर्याचे दर्शन सातत्याने होत राहाते. पृथ्वीवरील वातावरण, पृथ्वीवरील दिवस आणि रात्रीचे चक्र याचा यावर परिणाम होत नाही. आदित्य-एल १ वरील सातपैकी चार पेलोड सूर्याच्या दिशेने आहेत, तर तीन पेलोड विविध प्रयोग करतील, त्यामुळे सूर्यमालेतील सूर्याच्या विविध अंगाने शास्त्रीय माहिती मिळणार आहे.
पंतप्रधानांनी केले इस्रोच्या शास्त्रज्ञांचे
दरम्यान, भारताची पहिली सौर मोहीम आदित्य एल-१ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोमधील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले आहे. संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी ब्रह्मांडाची अधिक चांगली समज विकसित करण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील, असे पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करीत म्हटले आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=54562