Posted by वृत्तभारती
Tuesday, September 26th, 2023
मुंबई, (२६ सप्टेंबर) – बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना एक नवीन यश मिळाले आहे. या अभिनेत्रीला यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी अभिनेत्री वहिदा रहमान यांची निवड झाल्याची माहिती त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. ट्विटरवर पोस्ट करत अनुराग ठाकूर यांनी लिहिले, वहिदा रहमान जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित...
26 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
नवी दिल्ली, (२५ सप्टेंबर) – आठ दिवस उशीर झाला असला, तरी मान्सूनने देशातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. सोमवारी मान्सून राजस्थानच्या वायव्य भागातून माघारी फिरला आहे. साधारणपणे मान्सून १७ सप्टेंबर रोजी परतीचा प्रवास सुरू करीत असतो. मागील पाच दिवसांपासून राजस्थानच्या या भागात पाऊस झालेला नाही. तिथे संपूर्ण कोरडे वातावरण आहे. या वातावरणाचा अभ्यास करून हवामान खात्याने याबाबतची घोषणा एका निवेदनातून केली. यंदा मान्सूनच्या परतीचा प्रवास आठ दिवस उशिराने सुरू झाला....
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
नवी दिल्ली, (२५ सप्टेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीत ५ दशलक्ष फॉलोअर्स ओलांडल्यामुळे त्यांच्या चॅनेलमध्ये सामील झाल्याबद्दल व्हॉट्सअॅप समुदायातील त्यांच्या फॉलोअर्सचे आभार मानले. आम्ही ५० लाखांहून अधिक लोकांचा समुदाय झालो आहोत, माझ्या व्हॉट्सअॅप चॅनलद्वारे माझ्याशी जोडले गेलेल्या सर्वांचा मी आभारी आहे! तुमच्यापैकी प्रत्येकाच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आणि प्रतिबद्धतेबद्दल कृतज्ञ आहे. आम्ही संभाषण चालू ठेवू . या अद्भुत माध्यमातून विविध मुद्द्यांशी जोडले गेले आहे, असे पंतप्रधान मोदी...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
अयोध्या, (२५ सप्टेंबर) – अयोध्येत बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिराचे बांधकाम अतिशय वेगाने सुरू असू,न संपूर्ण परिसराच्या सुशोभिकरणाचे काम जोरावर आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सरकार राममंदिर परिसरात तब्बल १०० कोटी रुपये खर्चून देखणा मेगा मल्टीमीडिया ‘फवारा शो’ साकारणार आहे. जवळपास २५ हजार लोक एकाच वेळी एम्फीथिएटर पद्धतीने साकारलेल्या बैठक व्यवस्थेत या मेगा फाऊंटेनचा आनंद घेऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे, हा फवारा कमळाच्या आकाराचा राहणार आहे. गुप्तार घाट ते नया घाट या...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
-३५ शहरांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण, नवी दिल्ली, (२५ सप्टेंबर) – स्मार्ट सिटी अभियानात इंदूर, सुरत, आग्रा, वाराणसीसह ३२ शहरे आहेत, ज्यांनी इतर निधीतून पैसे काढून स्मार्ट सिटी प्रकल्पात गुंतवले आहेत. ११ शहरांनी दिलेल्या बजेटच्या दुप्पट खर्च केला. त्यांनी अमृत, हृदय, स्वच्छ भारत मिशन, मेक इन, डिजिटल इंडिया, पीएम आवास योजना, कर्ज आणि खासगी सहभाग यासारख्या केंद्र आणि राज्य सरकारच्या इतर योजनांमधून पैसे उभे केले. चांगली गोष्ट म्हणजे, ज्या...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
– एनआयए, आयबी, रॉ, एटीसचे अधिकार्यांची बैठक, नवी दिल्ली, (२५ सप्टेंबर) – खलिस्तान्यांचा संपूर्ण बीमोडासाठी केंद्र सरकारने कंबर कसली असून, देशातील सुरक्षा यंत्रणांची या मुद्यावर बैठक होणार आहे. ५-६ ऑक्टोबर रोजी होणारी ही बैठक एनआयएने बोलावली असून, त्यात आयबी, रॉ आणि विविध राज्यांतील एटीएसचे अधिकारी उपस्थित राहतील. या बैठकीत खलिस्तानी कारवाया, दहशतवादी निधी आणि गुंडांच्या टोळ्यांची पाळेमुळे खोदून काढण्याबाबत चर्चा होईल. विदेशातील खलिस्तानी अतिरेकी आणि गुंडांमध्ये साटेलोटे असून, त्यावर कारवाई...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
-ओडिशामध्ये भूस्खलनाचा रेल्वेगाड्यांवर परिणाम, नवी दिल्ली, (२५ सप्टेंबर) – देशभरातून पाऊस निरोप घेत असतानाच खाजगी हवामान संस्था स्कायमेटने पश्चिम बंगाल, बिहार, झारखंडचा काही भाग, अंदमान-निकोबार बेट समूह आणि महाराष्ट्रातील काही भागात हलका ते मध्यमसह दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मान्सूनचा कालावधी संपल्यानंतरही काही राज्यांमध्ये सातत्याने जोरदार पाऊस कोसळत आहे. ओडिशामध्ये काही दिवसांपासून पाऊस पडत असून, रविवारी मनाबार आणि जराती स्थानकादरम्यान भूस्खलन झाल्याने काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर, काहींचा मार्ग...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
-पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा, – ११ राज्यांना दिली भेट, नवी दिल्ली, (२४ सप्टेंबर) – यापूर्वी भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष दिले गेले नव्हते, ही अत्यंत दुर्दैवाची बाब होती. आता आम्ही परिवर्तनासाठी काम करीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वंदे भारत एक्सप्रेसला रविवारी आभासी स्वरूपात हिरवा झेंडा दाखवताना केले. ११ राज्यांना ‘वंदे भारत’ची भेट देण्यात आली आहे. या नऊ रेल्वे गाड्यांमुळे राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध‘प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल,...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
– ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, (२४ सप्टेंबर) – भारत-मध्यपूर्व-युरोप कॉरिडॉर येत्या शतकांत जागतिक व्यापाराचा आधार होईल आणि याची संकल्पना भारताने ठेवल्याचे इतिहासात कायम स्मरणात ठेवले जाईल, असे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात केले. भारत एक व्यावसायिक शक्ती होता, भरभराट होती त्यावेळी भारत प्राचीन ‘सिल्क रूट’चा वापर करायचा, अशी आठवण मोदी यांनी करून दिली. भारताने अलिकडेच झालेल्या जी-२० परिषदेत भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
नवी दिल्ली, (२४ सप्टेंबर) – ’मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा उत्तराखंडचा उल्लेख केला आहे. १०५ व्या आवृत्तीदरम्यान पीएम मोदींनी उत्तराखंडच्या नैनिताल जिल्ह्यातील ’घोडा लायब्ररी’चा उल्लेख केला. ’घोडा वाचनालया’चेही त्यांनी कौतुक केले. या कामासाठी पंतप्रधान मोदींनी नैनिताल आणि उत्तराखंडमधील जनतेचे अभिनंदन केले. स्वच्छता पखवाड्यात देशाला सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. वोकलसाठी लोकलला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. उत्तराखंडच्या कठोर भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागात वसलेल्या खेड्यांमध्ये चांगल्या...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, September 25th, 2023
दिल्ली, (२४ सप्टेंबर) – भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर पसरलेले विस्तीर्ण सुंदरबन जंगल हे जगातील सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलांपैकी एक आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये या खारफुटीच्या जंगलातील परिसंस्थेचे नकारात्मक नैसर्गिक आणि मानवनिर्मित परिणाम आणि नैसर्गिक संसाधनांच्या अतिशोषणामुळे गंभीर नुकसान झाले आहे. सुंदरबनचे होणारे नुकसान आणि नुकसान यावर चर्चा करण्यासाठी भारत आणि बांगलादेशातील तज्ञांचे एक परिसंवाद आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक तज्ञांनी आभासी माध्यमातून भाग घेतला होता. झपाट्याने वाढणारा कोळंबी शेती...
25 Sep 2023 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, September 24th, 2023
नवी दिल्ली, (२४ सप्टेंबर) – देशातील १८ राज्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला आहे. दिल्ली, बिहार, झारखंड, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील नागपुरात सर्वात वाईट परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री आभाळातून आपत्तीचा पाऊस पडला. गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घर, बाजारपेठ, शाळा, महाविद्यालयांमध्ये पाणी शिरले. रस्ते जलमय झाले होते. दरम्यान दिल्ली,...
24 Sep 2023 / No Comment /