Posted by वृत्तभारती
Thursday, October 14th, 2021
सेला बोगद्याचा अखेरचा टप्पा सुरू, राजनाथसिंह यांच्या हस्ते उद्घाटन, नवी दिल्ली, १४ ऑक्टोबर – संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज गुरुवारी अरुणाचल प्रदेशात तयार करण्यात आलेल्या सेला बोगद्याच्या अखेरच्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन केले. यामुळे तवांगमार्गे चीन सीमेपर्यंतचे अंतर १० किलोमीटरने कमी होणार आहे. यावेळी, जगातील सर्वांत उंचीवर तयार करण्यात आलेला अटल बोगदा असो किंवा जगातील सर्वांत उंच मोटरेबल पास (लेह-पेंगॉंग सरोवराला जोडणारी खिंड) असो वा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचणारा सेला बोगदा असो,...
14 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 12th, 2021
श्रीनगर, ११ ऑक्टोबर – जम्मू-काश्मिरातील पूंछ सेक्टरमध्ये लष्कराने आज सोमवारी राबवलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत पाच जवान हुतात्मा झाले आहेत. यामध्ये एका ज्युनियर कमिशन ऑफिसरचा (जेसीओ) समावेश असून, एक जवान जखमी झाल्याची माहिती संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली. सुरनकोटजवळील एका गावात दहशतवादी आले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. या सुरक्षा दलाने घातलेल्या वेढ्यात तीन ते चार अतिरेकी अडकले असल्याची माहिती प्रवक्त्याने दिली. लष्कराची...
12 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, October 9th, 2021
नवी दिल्ली, ९ ऑक्टोबर – भारताचे समुद्राशी फार जुने नाते आहे. आपला व्यापार, अर्थव्यवस्था, सण आणि संस्कृती यांचाही समुद्रासोबत अतिशय प्राचीन संबंध आहे. मात्र, अलिकडील काळात याच समुद्राशी संबंधित अनेक आव्हानांचा आपल्याला सामना करावा लागत आहे. आपल्याला सातत्यपूर्ण विकास करायचा असेल, तर समुद्रात विनायास प्रवेश आवश्यक आहे, असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी येथे केले. कुठल्याही अडचणींशिवाय समुद्रात प्रवेश मिळणे ही आपल्या देशाची प्राथमिक गरज आहे. यातच विकासाचा...
9 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, October 9th, 2021
भारताने पुन्हा दिली ड्रॅगनवर मात, नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर – शांततेची भाषा बोलणार्या ड्रॅगनची वळवळ अजूनही सुरूच असून, अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करण्याचा चिन्यांचा डाव उधळून लावताना भारतीय लष्कराने चीनच्या काही सैनिकांना अटक केली आहे. यावेळी काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चर्चेनंतर या सैनिकांना सोडण्यात आले. चिनी सैनिकांनी अरुणाचलच्या तवांगमध्ये घुसून भारतीय सीमेवरील रिकाम्या बंकर्सचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. चीनच्या सुमारे २०० सैनिकांनी भारतीय सीमेच्या आत प्रवेश करण्याचा...
9 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, October 9th, 2021
हवाई दलप्रमुख विवेक चौधरी यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ८ ऑक्टोबर – पूर्व लडाखमध्ये भारतीय हवाई दलाने चीनच्या कारवाया उलथवून लावल्या. या त्वरित कारवाईमुळे हवाई दलाची युद्धक्षमता चीन आणि संपूर्ण जगासमोर सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन हवाई दलप्रमुख विवेक चौधरी यांनी केले आहे. ८९ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हवाई दलाने नवी दिल्लीतील वायू दलाच्या हिंडन विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात विवेक चौधरी यांना सलामी देत झाली. भारतीय वायू दलाच्या...
9 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 6th, 2021
आव्हानांसाठी भारत सज्ज, नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या वायुतळांवर चिनी वायुदल अद्याप सक्रिय आहे, अशी माहिती वायुदलप्रमुख विवेक राम चौधरी यांनी आज मंगळवारी दिली. भारतीय वायुदलाचीदेखील तैनाती करण्यात आली असून, कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी वायुदल सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे तीन वायुतळांवर चिनी वायुदल अद्याप सक्रिय आहे, असे चौधरी यांनी भारतीय वायुदलाच्या ८९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले....
6 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, October 6th, 2021
आव्हानांसाठी भारत सज्ज, नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर – प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या वायुतळांवर चिनी वायुदल अद्याप सक्रिय आहे, अशी माहिती वायुदलप्रमुख विवेक राम चौधरी यांनी आज मंगळवारी दिली. भारतीय वायुदलाचीदेखील तैनाती करण्यात आली असून, कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी वायुदल सज्ज आहे, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे तीन वायुतळांवर चिनी वायुदल अद्याप सक्रिय आहे, असे चौधरी यांनी भारतीय वायुदलाच्या ८९ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले....
6 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, October 3rd, 2021
चीन उभारतोय् लडाखमध्ये पायाभूत सुविधा, कोणत्याही आव्हानासाठी भारत सज्ज ः मनोज नरवणे, लडाख, २ ऑक्टोबर – शांततेची भाषा बोलणार्या ड्रॅगनची वळवळ सुरूच आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्कर तैनात करण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. मात्र, चीनच्या कोणत्याही आगळिकीला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे दोन दिवसांच्या लडाख दौर्यावर आलेले लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज शनिवारी सांगितले. भारत आणि चीनमध्ये ऑगस्टमध्ये झालेल्या कमांडर पातळीवरील चर्चेनंतर जवळपास...
3 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, October 1st, 2021
नवी दिल्ली, ३० सप्टेंबर – वायुदलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया निवृत्त झाले असून, महाराष्ट्राचे सुपुत्र विवेक राम चौधरी यांनी आज गुरुवारी वायुदलप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी एअर मार्शल असलेल्या व्ही. आर. चौधरी यांना देशाचे वायुदलप्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच घेतला होता. चौधरी यांनी जुलै महिन्यात वायुदल उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता. विवेक राम चौधरी हे यापूर्वी भारतीय दलाच्या पश्चिमी कमांडचे कमांडर इन चीफ होते....
1 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, October 1st, 2021
लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन, नवी दिल्ली, ३० सप्टेंबर – भारत आणि चीनमध्ये सीमाकरार होईपर्यंत चीनच्या कुरापती सुरूच राहतील, असे प्रतिपादन लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी आज गुरुवारी केले. अफगाणिस्तानमध्ये होणार्या घडामोडींवर लष्कराने लक्ष केंद्रित केले आहे. या घडामोडींमुळे उद्भवू शकणार्या धोक्याचे आकलन केले जात आहे, तसेच त्यासाठी व्यूहरचना तयार केली जात आहे, असे नरवणे यांनी पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सांगितले. चीनसोबत सीमावाद किचकट असा...
1 Oct 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, September 28th, 2021
नवी दिल्ली, २८ सप्टेंबर – संरक्षण मंत्रालयाने आयुध कारखाने मंडळ बरखास्त केले असून, याअंतर्गत कार्यरत कर्मचार्यांना सात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये सामावून घेण्यात आले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत केंद्र सरकारने देशाच्या आयुध निर्माणी क्षेत्रात स्वायत्तता आणण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आयुध निर्माण क्षेत्रातील आजारी कंपन्यांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून या आजारी कंपन्या बंद करण्यात येत असून, यातील यंत्रे, साधन सामुग्री इतर सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये हस्तांतरित केले जाणार...
28 Sep 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, September 28th, 2021
राजनाथसिंह यांचे खाजगी क्षेत्राला आवाहन, नवी दिल्ली, २८ सप्टेंबर – संरक्षण क्षेत्रातील खाजगी कंपन्यांनी या क्षेत्रातील संशोधन आणि विकासासासाठी विशेषतः सायबरस्पेस क्षेत्रातील तंत्रज्ञानात गुंतवणूक करावी, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज मंगळवारी केले. जागतिक पातळीवरील सुरक्षा परिस्थितीत झपाट्याने बदल होत असून, त्यामुळे संरक्षण उपकरणांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा स्थितीत देशातील उद्योगांनी मोठ्या प्रमाणात संरक्षण उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे त्यांनी भारतीय संरक्षण उत्पादक संस्थेच्या...
28 Sep 2021 / No Comment /