किमान तापमान : 31.08° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 7.11 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.14°C - 32.99°C
few clouds28.46°C - 31.17°C
sky is clear28.9°C - 33.02°C
sky is clear29.05°C - 32.57°C
sky is clear28.8°C - 32.08°C
sky is clear28.33°C - 31.04°C
sky is clearकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय,
नवी दिल्ली, १५ डिसेंबर – पंतप्रधान कृषी सिंचन योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. नंतर एका पत्रपरिषदेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली. २०२०-२१ पासून २०२५- २६ पर्यंत ही योजना आता राबवली जाणार आहे. यामुळे अतिरिक्त १३.८८ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. असे ते म्हणाले.
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला मुदतवाढ देण्याच्या निर्णयामुळे सरकारला अतिरिक्त ९३ हजार कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे. यात केंद्राचा वाटा ३७४५४ कोटी रुपयांचा आहे. या योजनेमुळे २२ लाख शेतकर्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. यातील २.५ लाख अनुसूचित जातीचे तर २ लाख शेतकरी अनुसूचित जमातीचे राहणार आहेत. या योजनेत सहभागी अन्य कार्यक्रमांमुळे शेतकर्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती होणार आहे, त्यांचे उत्पन्नही वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले.
रुपे. डेबिट कार्ड तसेच कमी किमतीचे आर्थिक व्यवहार भीम युपीआयद्वारा डिजिटली करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजनाही सरकारने तयार केली आहे.
यासाठी १३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रुपे कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार वाढवण्यासाठी सरकार मर्चंट डिसकाऊंट रेटमध्ये पर्सन टू मर्चट पेमेंट रुपे डेबिट कार्ड तसेच युपीआय पेमेंडचे रिएम्बर्समेंट करणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.