किमान तापमान : 31.08° C
कमाल तापमान : 32.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 7.11 Mps
स्थळ : Mumbai, IN
32.99° C
28.14°C - 32.99°C
few clouds28.46°C - 31.17°C
sky is clear28.9°C - 33.02°C
sky is clear29.05°C - 32.57°C
sky is clear28.8°C - 32.08°C
sky is clear28.33°C - 31.04°C
sky is clearनवी दिल्ली, २७ मे – नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार जून महिन्याच्या दुुसर्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. कामगिरीच्या आधारावर काही मंत्र्यांना वगळले जाणार असून, काही नव्या चेहर्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचे समजते.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारचे दुसर्या कार्यकाळातील दुसरे वर्ष ३० मे रोजी पूर्ण होत आहे. ३० मे २०१९ रोजी मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. या दोन वर्षांच्या काळात काही मंत्र्यांचे निधन झाले, तर मित्र पक्षांच्या मंत्र्यांनी राजकीय कारणांवरून राजीनामे दिले. रिक्त झालेल्या या जागा कोरोनाची परिस्थिती आणि देशाच्या काही भागात होत असलेल्या विधानसभा निवडणुका यामुळे भरता आल्या नाहीत. मोदी मंत्रिमंडळात सध्या २२ कॅबिनेट, ९ राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि २९ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान तसेच रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले. तर शिवसेनेचे अरविंद सावंत, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामे दिले.
रामविलास पासवान भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या लोकशक्ती पक्षाचे होते. जदयूच्या कोणाचाच मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. त्या अर्थाने सध्या मंत्रिमंडळात भाजपाच्या मित्रपक्षाचा एकही सदस्य नाही.
जून महिन्यापर्यंत कोरोनाची परिस्थिती बर्यापैकी नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे २०२२ च्या मार्च महिन्यात उत्तरप्रदेशसह काही राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारासाठी सध्या उपयुक्त काळ असल्याचे मानले जात आहे.
मंत्र्यांचे निधन तसेच राजीनाम्यामुळे त्यांच्याकडील खात्याचा कार्यभार दुसर्या मंत्र्याकडे सोपवण्यात आला. त्यामुळे काही मंत्र्याकडील खात्यांचा कार्यभार आणि कामाचा ताणही वाढला आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळाचा विस्तार आवश्यक झाला आहे.
ज्योतिरादित्य, सुशीलकुमारांना मिळणार मंत्रिपद
कॉंग्रेसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे, बिहारमधून राष्ट्रीय राजकारणात आलेले सुशीलकुमार मोदी यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. आसाममधून सर्वानंद सोनोवाल यांनाही मंत्रिमंडळात घेतले जाऊ शकते. रामविलास पासवान यांच्या जागेवर त्यांचे पुत्र चिराग पासवान यांचा समावेश होऊ शकतो. मात्र, चिरागच्या मंत्रिमंडळातील समावेशाला जदयू विरोध करू शकते. जदयूच्या काही खासदारांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.
किमान दहा जणांच्या समावेशाची शक्यता
सामान्यपणे मंत्रिमंडळाची संख्या ८१ पर्यंत राहू शकते, पण सर्वच जागा भरल्या जाण्याची शक्यता नाही. रिकाम्या झालेल्या जागा पकडून आठ ते दहा जणांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे भाजपातीलही अनेक इच्छुकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विधानसभा निवडणुका असलेल्या उत्तरप्रदेश, गुजरातला या विस्तारात झुकते माप मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.