किमान तापमान : 28.64° C
कमाल तापमान : 28.99° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 84 %
वायू वेग : 5.22 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.99° C
28.51°C - 32.02°C
sky is clear28.87°C - 32.93°C
sky is clear29°C - 32.52°C
few clouds28.78°C - 32.42°C
sky is clear27.84°C - 30.17°C
sky is clear27.21°C - 29.62°C
sky is clearकोलकाता, [५ मे] – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज गुरूवारी सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. पूर्व मिदनापुर आणि उत्तर बंगालच्या कूच बिहार जिल्ह्यातील २५ मतदारसंघात हे मतदान पार पडणार आहे.
१७० उमेदवारांच भविष्य मतदानपेटीत बंद होणार असून यात १८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. ५८ लाख मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी ६७७४ मतदान केंद्र उभारण्यात आली आहे. विशेषतः कुचबिहार जिल्हयातील सीमेवरील भागातील रहिवाशी स्वातंत्र्यानंतर यंदा प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही मोजक्या ठिकाणीच हिंसेच्या घटना घडला असल्या तरी मतदान सुरळीत पार पडले. आता हे शेवटचे मतदानही सुरळीत पार पडावे यासाठी ५० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यात ३६१ कंपन्यांचा समावेश आहे. तसेच राज्य पोलिस दलाचे १२ हजार कर्मचारी यावेळी मतदानकेंद्रावर सुरक्षेवर लक्ष ठेवून असतील.