|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:31 | सूर्यास्त : 18:35
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 24.99° C

कमाल तापमान : 25.87° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 88 %

वायू वेग : 1.4 Mps

स्थळ : Mumbai, IN

24.99° C

Weather Forecast for
Wednesday, 20 Mar

24.99°C - 28.97°C

broken clouds
Weather Forecast for
Thursday, 21 Mar

26.35°C - 30.6°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 22 Mar

27.18°C - 31.53°C

overcast clouds
Weather Forecast for
Saturday, 23 Mar

26.77°C - 27.99°C

sky is clear
Weather Forecast for
Sunday, 24 Mar

26.09°C - 28.33°C

few clouds
Weather Forecast for
Monday, 25 Mar

25.8°C - 28.23°C

sky is clear
Home » क्रीडा » सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली

सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली

virat-kohli-testराजकोट, [१४ नोव्हेंबर] – अत्यंत कठिण पस्थितीत सामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात आहे. त्यामुळे टिकाकारांना कोणतीही टिका करण्याची संधीच नाही असे परखड मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. इंग्लंडविरुध्दची पहिली कसोटी अनिर्णीत सुटल्यानंतर विराट कोहली पत्रकारांशी बातचित करीत होता.
भारताचे एक-एक गडी तंबूत परतत असताना भारतावर पराभवाचे ढग पसरले होते. पण त्या प्रतिकूल स्थितीतही कर्णधार कोहलीने दुसर्‍या डावात नाबाद ४९ धावांची लढवैया खेळी केली. रवीन्द्र जडेजा याने चांगली साथ दिली. जडेजाने ३२ धावा काढल्या. या डावातील खेळाकडे बघता आता आम्हाला सामना कसा अनिर्णीत ठेवता येईल याची जाणीव झाली, कल्पनाही आली.
रवीन्द्र जडेजाशी बोलताना विराटने त्याला चिवट फलंदाजी करण्याचा सल्ला दिला. तो याच कारणास्तव. सामना अनिर्णीत ठेवण्याचे तंत्र आमच्याजवळ आहे ही खेळी विराट व रवीन्द्र यांनी मोठ्या खुबीने यशस्वीपणे खेळून काढली व सामना बरोबरीत सुटला.
खेळपट्टीवर आम्ही जेव्हा गवत बघितले, त्यावेळी आम्ही फारच बेचैन झालो याकडे लक्ष वेधून विराट कोहली म्हणाला की, खेळपट्टीवर गवत असते, ती येतेही. पण मोठ्या प्रमाणात गवत दिसताच बेचैनीने मनात घर करावयास सुरुवात केली होती. अशा घटना घडावयास नको होत्या. खेळपट्टी ही फलंदाजांनाच अनुकुल होती अशी स्पष्ट कबुलीही विराटने एका उत्तरात दिली.
खेळातील तिसर्‍या दिवसाच्या अंतिम सत्रातच खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करीत होती. याची जाणीव झाली होती. काही चेंडू उसळीही घेत होते. त्यामुळे संघातील ऑफ स्पिनरला ही खेळपट्टी अनुकूल ठरत होती. खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करीत होती. त्याकडे बघता भारतीय संघातील अमित मिश्रा, रवीन्द्र जडेजा, रविचंद्रन अश्‍विन या तिघांवर पाहुण्या इंग्लंड संघातील फिरकीपटूंनी आघाडी घेतली होती. हे मान्य करावेच लागले.

Posted by : | on : 15 Nov 2016
Filed under : क्रीडा
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g