किमान तापमान : 28.51° C
कमाल तापमान : 28.83° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 79 %
वायू वेग : 4 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.83° C
28.61°C - 32.02°C
sky is clear28.87°C - 32.93°C
sky is clear29°C - 32.52°C
few clouds28.78°C - 32.42°C
sky is clear27.84°C - 30.17°C
sky is clear27.21°C - 29.62°C
sky is clearचेन्नई, [३ एप्रिल] – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीकरिता माझ्या पक्षाने भाजपासोबत युती करण्याचा प्रयत्न केला होता. पण, भाजपानेच त्याला प्रतिसाद दिला नव्हता. आता हा पक्ष निराश झाला असल्यानेच माझ्यावर निराधार आरोप करीत आहे, अशा शब्दात अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री जयललिता यांनी हल्ला चढविला.
निवडणुका जवळ आल्या असताना युती होऊ शकली असती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोईम्बतूर येथील सभेच्या काळात माझ्या सरकारवर टीका केली नव्हती. माझे सरकार अतिशय चांगले काम करीत आहे, असा विश्वास त्यांना व्यक्त केला आहे. पण, आता भाजपाचे काही वरिष्ठ नेते व मंत्री माझ्या सरकारवर आरोप करीत आहेत. त्यांची निराशाच यातून दिसून येते, असे जयललिता यांनी स्पष्ट केले.