Posted by वृत्तभारती
Sunday, March 17th, 2024
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४ला संबोधित, नवी दिल्ली, (१७ मार्च) – जेथे संपूर्ण जग अनिश्चिततेच्या भोवर्यात अडकले आहे, तिथे भारताचा विकास वेगाने होत राहील, अशी स्पष्ट भावना आहे. मी जेव्हा जेव्हा अशा कॉन्क्लेव्हमध्ये येतो तेव्हा तुमची अपेक्षा असते की मी खूप मथळे घेऊन निघून जाईन, मी एक अशी व्यक्ती आहे जी हेडलाइनवर नाही तर डेडलाइनवर काम करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०२४...
17 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, March 17th, 2024
नवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणुकीसोबत निवडणूक आयोगाने आज सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांतील विधानसभेच्या ४१४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली. १७५ सदस्यांच्या आंध्रप्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासोबत म्हणजे १३ मेला मतदान घेतले जाणार आहे. ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे १९ एप्रिलला मतदान होईल. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेसाठीही १९ एप्रिललाच निवडणूक होणार आहे. १४७ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेसाठी १३ मे,...
17 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, March 17th, 2024
नवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणूक संपल्यानंतर लगेच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेतली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज स्पष्ट केले. सुरक्षा कारणामुळे जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेता येणार नाही. लोकसभा निवडणूक संपताच तिथे विधानसभा निवडणूक घेतली जाईल, असे ते म्हणाले. राज्यात आताच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या, तर विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात किमान दहा ते बारा उमेदवार उतरतील. म्हणजे संपूर्ण राज्यातील उमेदवारांची सं‘या हजारावर जाईल. या सर्व उमेदवारांना सुरक्षा...
17 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Sunday, March 17th, 2024
– १ जुलैपासून देशभरात होणार लागू, नवी दिल्ली, (१७ मार्च) – आपल्या मोबाईलमध्ये नवनवे सिमकार्ड, गुन्हेगारी कृत्यांसाठी आणि कमी किमतीचा टॉकटाईम घेऊन, तात्पुरत्या वापरासाठी सिमकार्ड घेणार्यांना आता आळा बसणार आहे. ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटर ऑथरिटी ऑफ इंडियाने नवी नियमावली जारी केली आहे. शुक्रवार १५ मार्च रोजी ही नियमावली जाहीर करण्यात आली असून, हे नवे नियम येत्या १ जुलैपासून लागू होणार आहेत. सायबर फसवणूक, ऑनलाईन ठगबाजी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा...
17 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, March 16th, 2024
– दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची दिली माहिती, नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत सरकारने जनतेसाठी केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती दिली. गेल्या काही वर्षांत कोणत्या योजना राबवल्या आणि कोणत्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या, याबाबतची माहिती मोदी यांनी पत्राद्वारे दिली. पंतप्रधान मोदी पत्रात लिहितात, माझ्या प्रिय कुटुंबीयांनो, तुम्ही मला साथ देऊन आता...
16 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, March 16th, 2024
– लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार, नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणूक २०२४ चा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषदेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, यावेळी लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यावेळच्या लोकसभा निवडणुका ७ टप्प्यात होणार आहेत. यावेळी निवडणूक आयुक्तांनी सांगितले...
16 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, March 16th, 2024
– पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून होणार, – ४ जूनला निकाल लागणार, – निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा केल्या जाहीर, नवी दिल्ली, (१६ मार्च) – निवडणूक आयोगाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लोकसभा निवडणूक ७ टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलपासून होणार असून, ४ जूनला निकाल लागणार आहे. दुसर्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिलला, तिसर्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्याचे मतदान १३...
16 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, March 16th, 2024
नवी दिल्ली, (१६ मार्च) – निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू होते. आचारसंहिता लागू झाल्याचे तुम्ही अनेकदा ऐकले असेल पण ती कधी आणि का लागू होते. हा एक मोठा प्रश्न आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होते आणि निकाल जाहीर होईपर्यंत सुरू राहते. भारतीय निवडणुकांचा सर्वात महत्त्वाचा भाग मानली जाणारी आचारसंहिता ही निवडणूक समितीने तयार केलेली मार्गदर्शक तत्त्वे आहे जी सर्व राजकीय पक्षांनी पाळली पाहिजे. ही मार्गदर्शक तत्त्वे म्हणजेच आचारसंहिता...
16 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, March 16th, 2024
– निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना काय असतात, नवी दिल्ली, (१६ मार्च) – लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. निवडणूक आयोग शनिवारी १६ मार्च रोजी पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे देशभरात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकार कोणताही नवीन निर्णय घेऊ शकणार नाही. देशात सरकारे असतील, पण निवडणुकीचे निकाल येईपर्यंत ते निष्क्रिय स्थितीत असतील. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांवरच...
16 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
– निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, नवी दिल्ली, (१५ मार्च) – लोकसभा निवडणुकीच्या तारखांची उद्या घोषणा होणार आहे. शनिवार, १६ मार्च रोजी निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुका २०२४ आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ही पत्रकार परिषद घेतली जाईल. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित केले जाईल. उद्या दुपारी निवडणूक आयोग पत्रकार परिषदेद्वारे लोकसभा निवडणुका आणि अनेक राज्यांतील...
15 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
नागपूर, (१५ मार्च) – नागपूर येथील रेशीमबागच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. महर्षी दयानंद सरस्वती सभागृहात होत असलेल्या या सभेला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित आहे. सभेची सुरुवात भारत मातेच्या छायाचित्राला पुष्पार्पणाने झाली. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्यासह संपूर्ण भारतातून जवळपास १५०० च्यावर स्वयंसेवक, महिला पदाधिकारी उपस्थित आहेत. तब्बल ६ वर्षानंतर नागपुरात...
15 Mar 2024 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, March 15th, 2024
नवी दिल्ली, (१५ मार्च) – लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असून भाजपाने दक्षिणेत आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी १०.३० वाजता केरळमधील पथनामथिट्टा येथे पोहोचतील, जिथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन त्यांचे स्वागत करतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला सुमारे एक लाख लोक उपस्थित...
15 Mar 2024 / No Comment /