|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:03 | सूर्यास्त : 18:44
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.17° C

कमाल तापमान : 29.53° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 68 %

वायू वेग : 4.41 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.17° C

Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.76°C - 32.04°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

29.01°C - 32.87°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 30 Apr

28.92°C - 32.33°C

scattered clouds
Weather Forecast for
Wednesday, 01 May

28.6°C - 31.92°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 02 May

27.63°C - 30.08°C

sky is clear
Weather Forecast for
Friday, 03 May

27.18°C - 29.55°C

sky is clear
Home » उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » ‘जय मीम जय भीम’ हाच आमचा नारा: ओवैसी

‘जय मीम जय भीम’ हाच आमचा नारा: ओवैसी

=लखनौत दाखवले काळे झेंडे=
Hyderabad MP Asaduddin Owaisiलखनौ, [२८ मार्च] – पहिल्यांदाच येथे दौर्‍यावर आलेले एमआयएम प्रमुख खा. असदुद्दिन ओवैसी यांना येथे आयोजित पत्रपरिषदेत सोमवारी काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी तेथे तैनात पोलिसांनी कारवाई करीत या निदर्शकांना तेथून हुसकावून लावले. तथापि, ते विरोधक नेमके कोण होते, याबाबत काही माहिती मिळाली नाही.
सोमवारी येथे पोहोचल्यावर ओवैसी पहिले देव शरीफ दर्ग्यात गेले. नंतर त्यांनी नदवाचे मौलाना रबे हसन अली नदवी आणि शिया मौलवी मौलाना कल्बे जवाद यांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.
मुजफ्फरनगर दंगलीबाबत राज्यातील सपा सरकारवर त्यांनी यावेळी निशाणा साधला. या दंगलीसाठी अखिलेश सरकारच जबाबदार असल्याने जनतेने त्यांना स्पष्टीकरण मागितले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या पत्रपरिषदेतून केली.
उत्तरप्रदेशात युवकांमधील उत्साह पाहता पुढे होणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष विजयी होईल, असा विश्‍वास व्यक्त करून ‘जय मीम, जय भीम’ हाच आमचा नारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे.
साडेतीन वर्षे झालीत. आपल्याला लखनौत सार्वजनिक सभा घेण्यापासून का रोखण्यात येत आहे, असा प्रश्‍नही त्यांनी सपा सरकारला यावेळी विचारला. देशभक्त विरुद्ध देशद्रोही या वादासह भारत माता की जय या घोषणेबाबत ओवैसी म्हणाले की, मुसलमानांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले असून आमच्या देशभक्तीवर कोणीही प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. त्यामुळे याबाबत आपल्याला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. पत्रपरिषदेत कोणत्याही प्रश्‍नांना उत्तरे न देताच ते नंतर सरळ विमानतळाकडे रवाना झाले.

Posted by : | on : 29 Mar 2016
Filed under : उत्तर प्रदेश, ठळक बातम्या, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g