किमान तापमान : 29.17° C
कमाल तापमान : 29.53° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 68 %
वायू वेग : 4.41 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.17° C
28.76°C - 32.04°C
sky is clear29.01°C - 32.87°C
sky is clear28.92°C - 32.33°C
scattered clouds28.6°C - 31.92°C
sky is clear27.63°C - 30.08°C
sky is clear27.18°C - 29.55°C
sky is clear=लखनौत दाखवले काळे झेंडे=
लखनौ, [२८ मार्च] – पहिल्यांदाच येथे दौर्यावर आलेले एमआयएम प्रमुख खा. असदुद्दिन ओवैसी यांना येथे आयोजित पत्रपरिषदेत सोमवारी काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी तेथे तैनात पोलिसांनी कारवाई करीत या निदर्शकांना तेथून हुसकावून लावले. तथापि, ते विरोधक नेमके कोण होते, याबाबत काही माहिती मिळाली नाही.
सोमवारी येथे पोहोचल्यावर ओवैसी पहिले देव शरीफ दर्ग्यात गेले. नंतर त्यांनी नदवाचे मौलाना रबे हसन अली नदवी आणि शिया मौलवी मौलाना कल्बे जवाद यांची भेट घेतली.
त्यानंतर त्यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.
मुजफ्फरनगर दंगलीबाबत राज्यातील सपा सरकारवर त्यांनी यावेळी निशाणा साधला. या दंगलीसाठी अखिलेश सरकारच जबाबदार असल्याने जनतेने त्यांना स्पष्टीकरण मागितले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी या पत्रपरिषदेतून केली.
उत्तरप्रदेशात युवकांमधील उत्साह पाहता पुढे होणार्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष विजयी होईल, असा विश्वास व्यक्त करून ‘जय मीम, जय भीम’ हाच आमचा नारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेे.
साडेतीन वर्षे झालीत. आपल्याला लखनौत सार्वजनिक सभा घेण्यापासून का रोखण्यात येत आहे, असा प्रश्नही त्यांनी सपा सरकारला यावेळी विचारला. देशभक्त विरुद्ध देशद्रोही या वादासह भारत माता की जय या घोषणेबाबत ओवैसी म्हणाले की, मुसलमानांनीही देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण दिले असून आमच्या देशभक्तीवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. त्यामुळे याबाबत आपल्याला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. पत्रपरिषदेत कोणत्याही प्रश्नांना उत्तरे न देताच ते नंतर सरळ विमानतळाकडे रवाना झाले.