Posted by वृत्तभारती
Saturday, January 16th, 2021
जनरल नरवणे यांचा चीनला स्पष्ट इशारा, नवी दिल्ली, १५ जानेवारी – देशाच्या उत्तर सीमेवरील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याचा भारताचा निर्धार असला, तरी भारतीय लष्कराच्या संयमाची परीक्षा कुणीही पाहू नये. आमचे लष्कर शांततावादी असले, तरी परिस्थितीनुसार प्रत्युत्तर देण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असा स्पष्ट इशारा लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज शुक्रवारी चीनला दिला. लष्कर दिन परेडला ते संबोधित होते. सीमेवरील ‘जैसे थे’ स्थिती बदलण्याचा कट रचणार्यांना भारतीय जवानांनी मागील वर्षी गलवान...
16 Jan 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, January 14th, 2021
नवी दिल्ली, १४ जानेवारी – भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेले तेजस लढाऊ विमान चीन आणि पाकिस्तानच्या जेएफ-१७ या लढाऊ विमानाच्या तुलनेत कित्येक पटीने उत्कृष्ट तसेच प्रगत आहे, अशी स्तुती भारतीय वायुदलाचे प्रमुख आर. के. एस. भदौरिया यांनी आज गुरुवारी केली. भारतीय विमान उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय वायुदलासाठी ८३ तेजस हलकी लढाऊ विमाने ४८ हजार कोटींत खरेदी करण्याचा निर्णय घेतला. ४५,६९६ कोटी रुपयांची तेजस एमके-१ ए आणि...
14 Jan 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, January 14th, 2021
नवी दिल्ली, १३ जानेवारी – संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून, देशातच विकसित करण्यात आलेल्या ८३ तेजस विमानाच्या खरेदीला सुरक्षेवरील कॅबिनेट समितीच्या बैठकीत आज बुधवारी मंजुरी देण्यात आली. हा व्यवहार सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी टि्वट करून या निर्णयाची माहिती दिली. भारतातच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून संरक्षण साहित्यांची निर्मिती करण्यात येत आहे. आत्मनिर्भर भारताकडे हे...
14 Jan 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, January 14th, 2021
जम्मू, १३ जानेवारी – सुरक्षा दलाच्या जवानांनी जम्मू-काश्मीरच्या कठाव जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर आणखी एका बोगद्याचा शोध लावला. सीमेवरून घुसखोरीचे सर्व मार्ग बंद झाल्याने अशा बोगद्यांच्या माध्यमातून अतिरेक्यांना भारतात पाठविण्याचा पाकिस्तानचा आणखी एक डाव जवानांनी हाणून पाडला आहे. अतिरेकी आणि पाकी सैनिकांनी व्याप्त काश्मिरातून हा बोगदा खोदला आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्येही जवानांनी अशाच एका बोगद्याचा छडा लावला होता. अतिरेक्यांना सहजपणे घुसखोरी करता यावी आणि घातपात घडविल्यानंतर पुन्हा व्याप्त काश्मिरात परत जाता...
14 Jan 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Thursday, January 7th, 2021
युद्धनौकांना मिळणार कॅलिबर बंदुका, अमेरिकेकडून होणार पुरवठा, नवी दिल्ली, ६ जानेवारी – भारतीय व अमेरिकन संरक्षण दलांमधील सैन्य संबंध, उभय देशांचा चीनसोबत चालू असलेल्या संघर्षात आणखी वाढत आहेत. कारण अमेरिकन नौदलाने भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना सुसज्जतेसाठी ३८०० कोटी रुपयांच्या करारांतर्गत त्वरित १२७ मध्यम कॅलिबर बंदुका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखापट्टणम-वर्ग विनाशकांसह भारतीय नौदलाच्या मोठ्या आकाराच्या युद्धनौकांवर सुसज्जतेसाठी १२७ मध्यम कॅलिबर क्षमता असलेल्या ११ बंदुका उपलब्ध करून द्याव्या, असे पत्र...
7 Jan 2021 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 23rd, 2020
जनरल नरवणे यांची लडाख सीमेला भेट, लेह, २३ डिसेंबर – लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज बुधवारी सकाळी लडाखच्या पूर्वेकडील सीमावर्ती भागांचा दौरा केला. उणे १४ अंश इतक्या कमी तापमानातही नरवणे यांनी सीमेवरील स्थितीचा आढावा घेतला. यावेळी नरवणे यांनी सर्व जवानांना सतर्क आणि सज्ज राहण्याचा आदेश दिला. त्यांच्यासोबत लष्करातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. गलवान खोर्यातील संघर्षानंतर मागील सात महिन्यांपासून या सीमेवर चीनसोबत तणाव आहे. याच पृष्ठभूमीवर जनरल नरवणे यांनी हा...
23 Dec 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Saturday, December 19th, 2020
हैदराबाद, १९ डिसेंबर – भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये लडाखच्या सीमेवर आतापर्यंत दोन वेळा संघर्ष झाले. भारत आता आधीसारखा कमजोर नाही. भारत आक्रमणकार्यांना सडेतोड उत्तर देऊ शकतो, हेच यातून सिद्ध झाले आहे. शांतता आम्हालाही हवी, पण राष्ट्राच्या आत्मसन्मानाशी आणि सार्वभौमत्वाशी तडजोड कदापि केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी येथे दिला. आम्ही कधीच कुणाच्या जमिनीवर डोळा ठेवला नाही आणि विस्तारवादी धोरणही राबविले नाही. एका देशाचा दुसर्या...
19 Dec 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, December 18th, 2020
नवी दिल्ली, १८ डिसेंबर – देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांकरिता सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या शस्त्र व इतर साहित्याच्या खरेदीला संरक्षण मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या तणावाच्या पृष्ठभूमीवर या शस्त्रास्त्र खरेदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यातील सर्वच शस्त्रे आणि अन्य साहित्य केंद्र सरकारच्या आत्मनिर्भय भारत अभियानांतर्गत देशातील उद्योगांकडूनच खरेदी केली जाणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत संरक्षण खरेदी...
18 Dec 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, December 18th, 2020
नवी दिल्ली, १८ डिसेंबर – देशा-देशांमधील वाद आणि संघर्षात समाजमाध्यमांचा बराच परिणाम होत असतो. आज क्षेपणास्त्रांपेक्षाही मोबाईल फोनची मारकक्षमता फार जास्त झालेली आहे. तंत्रज्ञान इतके जास्त अद्ययावत होत आहे की, भविष्यात अनेक देशांना नवनव्या धोक्यांचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज शुक्रवारी दिला. वार्षिक लष्करी साहित्य संमेलनात ते आभासी माध्यमातून बोलत होते. आजचा हा कार्यक्रम आणखी एका मुद्यामुळे महत्त्वाचा आहे. बदलत्या काळानुसार धोक्यांचे व युद्धाचे...
18 Dec 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 15th, 2020
नवी दिल्ली, १४ डिसेंबर – लडाखच्या पूर्व सीमेवर आपल्या जवानांनी अतिशय आक्रमक होत, चिनी सैनिकांचा सामना केला. त्यांच्या अभूतपूर्व शौर्यामुळेच चिनी सैनिकांना आपल्या सीमेवरून माघारी फिरणे भाग पडले होते, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी लष्करी जवानांची प्रशंसा केली. फिक्कीच्या सर्वसाधारण सभेला आभासी माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते. भारताच्या हिमालयीन भागात चीनच्या सैनिकांनी अचानक आक्रमण केले. यावरून जग किती झपाट्याने बदलत आहे आणि सीमावादावर अस्तित्वात असलेल्या करारांचे...
15 Dec 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Friday, December 11th, 2020
धोरणात्मक संबंध मजबूत करण्यावर भर : जनरल रावत, नवी दिल्ली, ११ डिसेंबर – भारतीय समुद्रात विविध देशांच्या १२० युद्धनौका सध्या वेगवेगळ्या मोहिमांसाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत. भारतासोबत धोरणात्मक सागरी संबंध मजबूत करण्यावर अनेक देश भर देत असल्याचेच हे संकेत आहेत, असे प्रतिपादन तिन्ही सशस्त्र दलांचे सेनापती (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी आज शुक्रवारी केले. जागतिक सुरक्षा परिषदेला आभासी माध्यमातून संबोधित करताना रावत बोलत होते. अनेक देशांना भारतासोबत चांगले आणि मैत्रिपूर्ण...
11 Dec 2020 / No Comment /
Posted by वृत्तभारती
Monday, December 7th, 2020
आत्मनिर्भर भारत अभियानाचे आणखी एक यश, नवी दिल्ली, ७ डिसेंबर – चीन आणि पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पृष्ठभूमीवर भारताला लवकरच २०० हॉवित्झर तोफा मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या तोफांची निर्मिती आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत होणार असून, या अत्याधुनिक तोफांमुळे भारतीय लष्कराची ताकद कितीतरी पटीने वाढणार आहे. सध्या भारतीय लष्कराला ४०० आर्टिलरी तोफांची आवश्यकता आहे. भारताने इस्रायलकडे काही तोफांची मागणी केली होती. त्यानंतर देशातच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हॉवित्झर तोफांच्या निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात...
7 Dec 2020 / No Comment /