किमान तापमान : 29.59° C
कमाल तापमान : 31.19° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 7.06 Mps
स्थळ : Mumbai, IN
31.19° C
27.43°C - 31.99°C
few clouds27.71°C - 30°C
sky is clear27.4°C - 29.73°C
sky is clear27.69°C - 30.09°C
sky is clear28.16°C - 29.86°C
broken clouds26.69°C - 30.54°C
light rainनवी दिल्ली, (०८ ऑक्टोबर) – या वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जात आहे. जिथे आतापर्यंत एकूण ४ सामने खेळले गेले आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवर्यात सापडली आहे. सर्वप्रथम, शेड्यूल उशिरा रिलीज झाल्याने आणि रिलीजनंतर त्यात बदल केल्यामुळे चाहत्यांना आधीच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. चाहत्यांनी जुन्या वेळापत्रकाच्या आधारे त्यांचे प्लॅन बनवले होते. आता प्रशासन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. खरं तर, विश्वचषक सामन्यांदरम्यान रिकामे स्टँड पाहून चाहते सोशल मीडियावर वर्ल्ड कप व्यवस्थापनाला खूप ट्रोल करत आहेत.
एकदिवसीय विश्वचषकादरम्यान आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यांमध्ये स्टेडियम रिकामे दिसले, परंतु जेव्हा तिकिटांचे बुकिंग सुरू झाले तेव्हा काही तासांतच ही सर्व तिकिटे विकली गेली. तिकीट न मिळाल्याने चाहत्यांची चांगलीच निराशा झाली, मात्र सामन्यादरम्यान रिकामे स्टँड पाहून त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विश्वचषकाच्या उद्घाटनाच्या सामन्यातही ६० ते ७० टक्के स्टेडियम रिकामे होते, त्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी आयसीसीला अनेक प्रश्न विचारले. आता सर्व तिकिटे संपल्यानंतरही स्टेडियम कसे रिकामे राहू शकते हे व्यवस्थापनच स्पष्ट करू शकेल.
१४ ऑक्टोबर रोजी होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या सामन्याबाबत चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने या सामन्यासाठी आणखी १४ हजार तिकिटे पुन्हा जारी केली आहेत. भारत-पाक सामन्याचे महत्त्व समजून बीसीसीआयने गेल्या महिन्यात अतिरिक्त तिकिटेही जारी केली होती. भारत-पाकिस्तान सामन्यासाठी अतिरिक्त १४ हजार तिकिटे जारी करण्याची घोषणा करण्याबरोबरच, बीसीसीआयने सांगितले की, ही तिकिटे ८ ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी १२ वाजता विकली जातील. अधिकृत तिकीट बुकिंग वेबसाइटला भेट देऊन चाहते ही तिकिटे खरेदी करू शकतात.