किमान तापमान : 27.46° C
कमाल तापमान : 28.48° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 78 %
वायू वेग : 1.3 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.48° C
27.68°C - 30.23°C
sky is clear27.6°C - 29.81°C
sky is clear27.47°C - 29.9°C
sky is clear27.78°C - 30.21°C
sky is clear27.88°C - 29.97°C
scattered clouds28.06°C - 30.31°C
scattered cloudsऑलिम्पिकमध्ये महिला हॉकीची मोठी झेप : पंतप्रधानांनी केले कौतुक, खिलाडूवृत्ती सोडली नाही, ग्रेट ब्रिटनला तिसरे स्थान,
टोकियो, ६ ऑगस्ट – इतिहास रचणार्या भारतीय महिला हॉकी संघाचे आपले पहिले ऑलिम्पिक पदक मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. शुक्रवारी टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटनविरुद्ध कडवी झुंज देऊनही भारतीय संघाला ४-३ अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला. कांस्य गमावले असले तरी या सामन्यासह संपूर्ण स्पर्धेत खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करीत महिला हॉकीपटूंनी सार्यांचे मने जिंकली.
भारतीय महिलांनी यापूर्वीच इतिहास रचला होता आणि पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून सर्व अपेक्षा मागे टाकल्या होत्या, परंतु पहिले ऑलिम्पिक पदक आवाक्याच्या बाहेर ठरले, कारण भारतीय संघाची झुंज चौथे विश्वमानांकित व २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकचे सुवर्णपदक विजेत्या ग्रेट ब्रिटनशी होती व या सामन्यात भारताला अवघ्या एका गोलच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय पुरुष संघाने जर्मनीवर ५-४ ने विजय मिळवित कांस्यपदक जिंकून ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवल्याच्या एका दिवसानंतर हा धक्का बसला. एकूणच महिला हॉकीपटूंचा खेळ पाहाता आता भारतीय हॉकीतही नारीशक्तीचा उदय झाला असल्याचे दिसून येते.
भारतीय महिला हॉकीपटूंनी उत्स्फूर्त खेळाचे प्रदर्शन केले आणि दोन गोलची पिछाडी भरून काढीत मध्यंतरापर्यंत ३-२ अशी आघाडी घेतली. परंतु ग्रेट ब्रिटनने उत्तरार्धात आपले सर्वस्व पणाला लावले आणि भारताच्या हातातून सामना आणि कांस्यपदक हिसकावण्यासाठी दोन गोल केले.
गुरजीत कौर (२५ व्या व २६ व्या मिनिटाला) आणि वंदना कटारियाच्या (२९ व्या) माध्यमातून भारताने पाच मिनिटांच्या कालावधीत तीन गोल करून ग्रेट ब्रिटनला चकित केले, परंतु ग्रेट ब्रिटनच्या एलेना रेयर (१६ वे), सारा रियोबर्टसन (२४ वे), कर्णधार होली पेर्ने-वेब (३५ वे) व ग्रेस बाल्डसनने (४८ वे) चार गोल नोंदवून ग्रेट ब्रिटनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भारताने चौथे स्थान मिळविले होते व ऑलिम्पिकमध्ये भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली होती.